P M Modi and Congress leader Raul Gandhi to speak in Lok Sabha today 
देश

आज लोकसभेत पंतप्रधान मोदी-राहुल गांधी आमने सामने

गोमन्तक वृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी हे संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज लोकसभेत आपले मत मांडू शकतात शकतात. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाबद्दल पंतप्रधान मोदी मोशन ऑफ थँक्सला उत्तर देणार आहेत, तर राहुल गांधी हे 1 फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर लोकसभेत चर्चा करणारे कॉंग्रेसचे पहिले वक्ते असतील. पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील मोशन ऑफ थँक्सच्या प्रस्तावावर आपले मत मांडले आहे.

तत्पूर्वी, मंगळवारी दुपारपासून सुरू झालेल्या लोकसभेची कार्यवाही बुधवारी पहाटे 1 वाजेपर्यंत चालू होती. खासदारांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल मोशन ऑफ थँक्सवरील चर्चेत भाग घेतला. राष्ट्रपती कोविंद यांनी संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताच 29 जानेवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले; बहुतेक विरोधी पक्षांनी, कृषी कायद्यांच्या विरोधात आणि निषेध करणार्‍या शेतकर्‍यांशी एकता दर्शविण्यासाठी या आभिभाषणावर बहिष्कार टाकला होता. अर्थसंकल्पीय सत्राचा पहिला भाग 13 फेब्रुवारीला संपेल, तर दुसरे सत्र 8 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत होईल.

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते अधीर रंजन चौधरी यांच्यानंतर राहुल गांधी लोकसभेत काँग्रेसच्या वतीने केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात करतील. तर, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाबद्दल पंतप्रधान मोदी मोशन ऑफ थँक्सवर उत्तर देतील. सोमवारी त्यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

Mini Narkasur: दिवाळीची लगबग! 'मिनी नरकासुर' विक्रीसाठी सज्ज; किंमत वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT