<div class="paragraphs"><p>Vaccination</p></div>

Vaccination

 

Dainik Gomantak

देश

सध्या तरी 15 वर्षांखालील मुलांना लस देण्याची योजना नाही: अधिकारी

दैनिक गोमन्तक

भारतात, 3 जानेवारीपासून, 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोना साथीच्या रोगापासून वाचवण्यासाठी लस (Vaccination) देण्यास सुरुवात होईल. लोकांना आशा आहे की लवकरच ही लस 15 वर्षांखालील मुलांना दिली जाईल. परंतु सध्या भारताची 15 वर्षांखालील मुलांना लसीकरण करण्याची कोणतीही योजना सरकारची नाही.

जोखमीचा दाखला जाहीरकरत एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, प्रशासनाने 15-18 वयोगटातील लसीकरणास मान्यता देण्यापूर्वी त्याचा विचार केला होता. जगातील अनेक देश बालकांना लसीकरण करत आहेत. कुठे 5 वर्षे आणि 2 वर्षांपर्यंतच्या मुलांना कोविड लसीकरण केले जात आहे.

मुलांनाही कोरोना विषाणूचा धोका कायम आहे आणि Omicron च्या आगमनानंतर पालकांच्या चिंता वाढली आहे. मुले व्हायरसचे वाहक बनू शकतात. नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'आमचा निर्णय पूर्णपणे वैज्ञानिक डेटावर आधारित आहे, ज्यावरून असे दिसून येते की जगात कोठेही लहान मुलांवर विषाणूचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत नाही.

सुरुवातीला आमचे असे मत होते की केवळ प्रौढांसाठी लसीकरणास परवानगी दिली पाहिजे, परंतु नंतर लक्षात आले की हे तरुण प्रौढ 15-18 वयोगटातील शाळा किंवा महाविद्यालयात जात आहेत, फिरत आहेत आणि त्यामुळे त्यांना विषाणूचा धोका जास्त आहे. त्या मुळे ते विषाणुचे वाहक होऊ शकतात.

'भारताचे (India) धोरण अमेरिका (America) आणि ब्रिटनपेक्षा (Britain) वेगळे का आहे, असे विचारले असता, हे दोन्ही देश 5 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलांना लसीकरण करत आहेत? या प्रश्नाच्या उत्तरात अधिकाऱ्याने सांगितले की, भारताचा निर्णयही जुलैमध्ये झालेल्या सेरोलॉजिकल सर्वेक्षणावर आधारित होता.

ज्यामध्ये असे आढळून आले की 67.6 टक्के लोकसंख्येला धोका आहे, ज्यात मुलांची संख्या जास्त आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (Indian Council of Medical Research) प्रमुख बलराम भार्गव यांनी सांगितले की, सर्वेक्षणात 6 ते 17 वयोगटातील मुलांचा समावेश आहे आणि असे आढळून आले आहे की सहा वर्षांवरील लोकसंख्येपैकी दोन तृतीयांश लोकांना आधीच संसर्ग झाला आहे.

यावर अधिकारी म्हणाले की, 'लसीकरण कशाला करायचे? काही काळापासून देशाच्या विविध भागात शाळा आणि महाविद्यालयेही सुरू झाली आहेत आणि आम्हाला तेथे संसर्ग वाढताना दिसत नाही. तसेच मुले गंभीरपणे आजारी पडतानाही आपण पाहत नाही.

केंद्र (Central Government) आणि राज्य सरकार (State Government) सध्या कोरोना विषाणूच्या नवीन ओमिक्रॉन प्रकारापासून संरक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना राबवत आहेत. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, 'भारतात आढळलेल्या 500 ओमिक्रॉन प्रकरणांपैकी निम्मे बरे आहेत आणि ते घरी गेले आहेत. गंभीर आजार विसरून जा, केवळ 13 टक्के लोकांमध्ये लक्षणे दिसून आली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गासाठी राज ठाकरेंचं भर सभेत मोदींकडं साकडं

OCI चे भवितव्य आता गृहमंत्री अमित शहांच्या हाती, CM सावंत म्हणतात... 'आम्ही कोणाला फसविले नाही'

India Russia Relations: भारत रशिया यांच्यात होणार मोठा करार; पुतिन सरकारच्या सहकार्याने बनवला ‘हा’ प्लॅन

Swati Maliwal Assault Case: 'भाजपने षड्यंत्राचा भाग म्हणून स्वाती मालीवाल यांना...', 'आप' नेत्या आतिशी यांचा घणाघात

Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT