Lata Mangeshkar Passes Away Dainik Gomantak
देश

Goodbye Lata Didi: 'भारतीय संस्कृतीच्या स्वरलतांना येणारी पिढी स्मरणात ठेवेल'

पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दैनिक गोमन्तक

हिंदी चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे, गान कोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे निधन झाले आहे. लता मंगेशकर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास (Lata Mangeshkar Passes Away) घेतला आहे. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh), केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

पीएम मोदींनी ट्विट केले की, 'मी माझ्या वेदना शब्दात व्यक्त करू शकत नाही. दयाळू लता दीदी आपल्याल सोडून गेल्या. त्यांनी आपल्या देशात एक पोकळी सोडली आहे जी भरून काढता येणार नाही. येणाऱ्या पिढ्या त्यांना भारतीय संस्कृतीचा एक दिग्गज म्हणून स्मरण ठेवतील, ज्यांच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अद्भुत क्षमता होती.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट केले की, 'स्वर कोकिळा' लता मंगेशकर यांच्या निधनाने भारताचा आवाज हरवला आहे. लताजींनी स्वर आणि सुराची साधना आयुष्यभर केली. त्यांनी गायलेली गाणी भारतातील अनेक पिढ्यांनी ऐकली आणि गायली आहेत. त्यांच्या निधनाने देशाच्या कला आणि संस्कृतीची मोठी हानी झाली. त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांसाठी माझ्या संवेदना.

लता मंगेशकर गेल्या महिनाभरापासून आजारी होत्या. 8 जानेवारी रोजी त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्याकडे येणारी बस अंकोल्यात उलटली; एकाचा मृत्यू, 20 प्रवासी गंभीर जखमी; चालकाचे सुटले नियंत्रण

Stray Cattles: डिचोलीतील चौपदरी बगलमार्गावर मोकाट गुरांचा उपद्रव कायम, अपघातांचा धोका; दोन वर्षांत 15 गुरांचे बळी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ अव्वल दहातून बाहेर! 3 महिन्यांत 3.21 लाख प्रवासी कमी; विमान वाहतुकीत मंदीचे संकेत

वीरेश बोरकर यांची वाढती लोकप्रियता मनोज परब यांना खुपली? 'रिव्होल्युशनरी गोवन्स' पक्षाच्या चिंधड्या उडण्यामागचं खरं कारण काय?

Bhagur Village: इंग्लंडला धडकी भरवणारं भारतातील 'ते' खोडकर गाव, जाणून घ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'भगूर'चा थरारक इतिहास

SCROLL FOR NEXT