आंध्रप्रदेश: कुर्नूल चिन्नातेकूर परिसरात खासगी प्रवासी बसला भीषण आग लागल्याने २० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तर, १२ हून अधिकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हैद्राबाद - बंगळुरु दरम्यान जाणाऱ्या कावेरी ट्रॅव्हल्समध्ये पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात घडला. बसमध्ये ४० ते ४२ प्रवासी प्रवास करत असल्याची माहीती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हैद्राबाद ते बंगळुरु दरम्यान धावणाऱ्या कावेरी ट्रॅव्हल्समध्ये पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास आग लागली. दुचाकी महामार्गावर घसरुन बसच्या इंधन टाकीला धडकली यामुळे टाकीचा स्फोट झाल्याने बसला आग लागली. आग एवढी भीषण होती की बसमधील २० हून अधिक प्रवाशांचा जळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तसेच, १२ प्रवासी जखमी झाल्याचे माहिती समोर आली आहे. काहीजण सुरक्षितपणे बाहेर पडल्याचेही सांगितले जाते. दरम्यान, पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातावेळी अनेकजण झोपेत होते. त्यामुळे आग लागल्यानंतर लगेच बाहेर पडता आले नाही.
या अपघातातबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला आहे. अपघातात जखमी झालेले लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना त्यांनी केली.
बस लाग लागल्यानंतर काही क्षणातच आगीने संपूर्ण बसचा ताबा घेतला. आगीचे भीषण लोळ हवेत जाताना दिसत होते. दरम्यान, यावेळी बसमधील प्रवासी मदतीसाठी याचना करत होते, बसमधून किंचळण्याचे आवाज येत होते. बसला आग लागताच बस चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.