India's space agency ISRO is facing more than 100 cyber attacks every day Dainik Gomantak
देश

ISRO दररोज हाणून पाडते 100 हून अधिक सायबर हल्ले

Ashutosh Masgaunde

India's space agency ISRO is facing more than 100 cyber attacks every day:

भारताची स्पेस एजन्सी इस्रोला दररोज 100 हून अधिक सायबर हॅकिंगच्या प्रयत्नांना सामोरे जावे लागत आहे. कोची येथे नुकत्याच झालेल्या सायबर सुरक्षा कार्यक्रमादरम्यान इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी ही माहिती दिली.

"फक्त इस्रोच नाही तर इतर अनेक यंत्रणा (इतर संस्थांच्या) ज्यांना शेकडो सायबर (हॅकिंग) प्रयत्नांना सामोरे जावे लागते. परंतु असे प्रयत्न आमच्या अनेक संरक्षण उपायांनी थांबवले आहेत. सायबर हल्ला तेव्हाच होतो जेव्हा तो सुरक्षा व्यवस्थेत घुसण्यात यशस्वी होतो.

पण प्रथम आम्ह असे घडूच देत नाही. अशा प्रयत्नांना तोंड देण्यासाठी इस्रोकडे मजबूत सुरक्षा नेटवर्क आहे. आमच्याकडे अनेक फायरवॉल आणि सुरक्षा यंत्रणा आहेत. त्यामुळे हल्लेखोरांचे हे सर्व प्रयत्न फेल होत आहेत,” असे सोमनाथ यांनी सांगितले.

इस्रो प्रमुख म्हणाले की सॉफ्टवेअर व्यतिरिक्त, इस्रो आता रॉकेटमधील हार्डवेअर चिप्सच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करून वेगवेगळ्या चाचणीवर देखील पुढे जात आहे.

ते म्हणाले की, इस्रोकडे उपग्रह देखील आहेत जे सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनात मदत करतात. हे सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रित केले जातात. या सर्वांच्या सुरक्षेसाठी सायबर सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे.

एस सोमनाथ म्हणाले की, तंत्रज्ञान वरदान आणि धोका दोन्ही आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्हेगारांकडून निर्माण होणाऱ्या आव्हानांना आपण तोंड देऊ शकतो. या दिशेने संशोधन आणि मेहनत व्हायला हवी.

सोमनाथ यांनी देशाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अतिशय मजबूत सायबर सुरक्षा समज आणि ज्ञानाची गरज असल्याचे सांगितले.

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, चंद्रावर लँडिंगशी संबंधित एक छोटासा कार्यक्रम देखील चालवणे किती क्लिष्ट आहे आणि अशा कोणत्याही अंतराळ क्रियाकलापांशी संबंधित धोका किती मोठा आहे.

इस्रो प्रमुखांनी एकदा प्रक्षेपित झाल्यानंतर उपग्रहाची सुरक्षा यंत्रणा अपग्रेड करण्याच्या आव्हानांबद्दलही सांगितले.

हे एक मोठे आव्हान का आहे याबद्दल, सोमनाथ म्हणाले की, जेव्हा संस्थेने एक कम्युनिकेशन उपग्रह प्रक्षेपित केला तेव्हा तो तेथे 15 वर्षे टिकून राहणे अपेक्षित आहे. यासाठी सॉफ्टवेअर बदल, ऑपरेटिंग सिस्टम, हार्डवेअर इत्यादींचे अपग्रेडेशन किती महत्त्वाचे आहे याची कल्पना तुम्ही करू शकता.

केरळ पोलीस आणि इन्फॉर्मेशन सिक्युरिटी रिसर्च असोसिएशनने येथे या परिषदेचे आयोजन केले होते हे विशेष.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

शाळकरी मुलांच्या बाबतीत आपण किती जागरूक, शिक्षित आणि गंभीर आहोत?

विजयनगर साम्राज्य, गोव्याचा संदर्भ; मदुराई आणि कुमार कंपण्णांचा इतिहास याबद्दल जाणून घ्या

Top Most Polluted Countries: जगातील 'हे' 8 देश सर्वाधिक प्रदूषित; क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर!

Goa Politics: दिल्लीत नेमके 'काय' घडले? 'कुणाला' समज, 'कुणाला' आदेश..

SCROLL FOR NEXT