भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवरवर भारत आशिया चषक खेळणार नसल्याच्या बातम्या सकाळपासूनच सुरु होत्या. मात्र आता, बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी यावर स्पष्टीकरण दिले. अशा प्रकारच्या बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचे त्यांनी म्हटले. या बातम्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, महिला इमर्जिंग टीम्स आशिया कपसह दोन आगामी स्पर्धांमधून बीसीसीआयने माघार घेतल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसकडून देण्यात आले होते. मात्र आता आगामी आशियाई क्रिकेट परिषदेच्या स्पर्धा वगळण्याबाबत बीसीसीआयने या अटकळींचे खंडन केले. सैकीया म्हणाले की, स्पर्धेतून माघार घेण्याबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. सकाळपासून येत असल्याच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आणि निराधार आहेत.
सैकिया म्हणाले की, 'आशिया कप आणि महिला इमर्जिंग टीम्स आशिया कप या स्पर्धातून बीसीसीआय (BCCI) माघार घेणार असल्याच्या बातम्या आमच्या निदर्शनास आल्या. अशा बातम्या पूर्णपणे निराधार आहेत. बीसीसीआयने अद्याप अशाप्रकारचा कोणताही निर्णय घेतला नाही. बीसीसीआयने आतापर्यंत आगामी आशियाई स्पर्धांबाबत कोणतीही चर्चा किंवा पाऊल उचललेले नाही.'
आशिया कपचा शेवटचा हंगाम 'हायब्रिड मॉडेल' अंतर्गत खेळवण्यात आला होता. त्यावेळी, भारत (India) आणि पाकिस्तान एकाच गटात होते. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दोन वेळा आमने-सामने आले होते. मात्र दुसरा सामना पावसामुळं रद्द करण्याची नामुष्की ओढावल्याने चाहत्यांचा हिरमूड झाला होता. यानंतर, अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला शिकस्त देत ट्रॉफी जिंकली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.