10th 12th.jpg 
देश

दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सीबीएससी'चा मोठा निर्णय 

दैनिक गोमंतक

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. देशभरातील इयत्ता दहावी च्या बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आल्या आहे. तर बारावीच्या परीक्षा 1 जून पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावीचे निकाल राज्य शिक्षण मंडळाने विकसित केलेल्या वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे तयार केले जातील. तर इयत्ता 12 वी च्या परीक्षा नंतर घेण्यात येतील, 1 जून रोजी मंडळामार्फत परिस्थितीचा आढावा घेऊन इयत्ता 12 वीच्या परीक्षांबबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोरखियाल निशंक यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे देशभरातील विद्यार्थ्याना दिलासा मिळाला आहे. ( Important news for 10th to 12th grade students; CBSC's big decision) 

दरम्यान, गोव्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहता गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (जीबीएसएचएसई) गेल्या आठवड्यात  दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा 2020-21 वेळापत्रकानुसार घेण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. जीबीएसएचएसईने जाहीर केलेल्या तारखांनुसार उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (एचएसएससी) बोर्डाची परीक्षा 24 एप्रिल ते 17 मे  या कालावधीत नियोजित होती. तर माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षा 19 मे ते 2 जून या कालावधीत घेण्यात येणार होती.  जीबीएसएचएसईचे अध्यक्ष भागीरथ शेट्टी यांनी दहावी बारावी परीक्षांबाबत माहिती दिली होती. त्याचबरोबर परीक्षेदरम्यान,  मास्क लावणे,  शारीरिक अंतर राखणे, वर्ग व केंद्रे स्वच्छ करणे, विशेष वैद्यकीय पथक, कंटेन्ट झोनमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष तरतूद या काही बाबी परीक्षेच्या वेळी पाळण्याचे आदेशही देण्यात आले होते. तथापि, यावर्षी राज्यभरातून तब्बल 19, 241 विद्यार्थी बारावीची तर 24,000 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत.  मात्र आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयाने सर्व विद्यार्थ्याना दिलासा मिळाला आहे. 

महाराष्ट्र राज्य सरकार दहावीची परीक्षा रद्द करणार नाही 
त्याचबरोबर, गोव्याच्या शेजारचे राज्य असलेल्या महाराष्ट्रातही  कोरोनाची परिस्थिती खूपच चिंताजनक झाली आहे. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती पाहता तेथील शिक्षण विभागानेही दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. राज्यात 23 एप्रिल ते 21 मे,  2021  या कालावधीत बारावीची परीक्षा होणार होती. तर 29  एप्रिल ते 20 मे 2021  या कालावधीत दहावीची परीक्षा होणार होती. मात्र राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी  परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रात या वर्षी सुमारे १५ लाख विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत तर सुमारे 17 लाख विद्यार्थी यावर्षी दहावीची परीक्षा देणार होते.  तथापि, केंद्र सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असल्या तरी राज्यसरकार दहावीची परीक्षा रद्द करणार नाही,  असा निर्णय  महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

SCROLL FOR NEXT