भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २३ फेब्रुवारी रोजी खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने शानदार खेळ करत पाकिस्तानला ६ गडी राखून पराभूत केले. भारत-पाकिस्तान सामन्यानंतर आयआयटीयन बाबा अभय सिंग सोशल मीडियावर खूपच ट्रोल होत आहे. त्याने सामन्यापूर्वी एक मोठी भविष्यवाणी केली होती.
भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला. या सामन्यापूर्वी आयआयटीयन बाबांनी एक मोठी भविष्यवाणी केली होती. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागेल, असे त्यांनी म्हटले होते.
कोहली कितीही ताकद लाऊदेत, भारत कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकणार नाही असा दावा आयआयटी बाबाने केला होता.
पण भारत-पाकिस्तान सामन्या बाबतचा आयआयटीयन बाबाचा अंदाज चुकला. भारताने हा सामना जिंकला आणि विराट कोहलीनेही या सामन्यात एक दमदार शतकही झळकावले. आता भारतीय संघाच्या विजयानंतर बाबाला वाईटरित्या ट्रोल केले जात आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २४१ धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून सौद शकीलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ६२ धावांची खेळी खेळली.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने केवळ ४२.३ षटकांत सामना जिंकला. किंग कोहलीने १११ चेंडूत १०० धावांची नाबाद खेळी केली. त्याच्याशिवाय श्रेयस अय्यरने ५६ धावा केल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.