Supreme Court
Supreme Court  Dainik Gomantak
देश

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये संबंध तुटल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल होत नाही: Supreme Court

दैनिक गोमन्तक

दोन व्यक्ती दीर्घकाळ एकत्र राहत असतील आणि नंतर त्यांचे नाते बिघडत असेल, तर बलात्काराचा आरोप करणे योग्य नाही, असा पुनरुच्चार सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सुनावनी दरम्यान केला आहे. खरे तर असे अनेकवेळा दिसून आले आहे की एक स्त्री आणि पुरुष लग्नाशिवाय वर्षानुवर्षे एकत्र राहतात आणि एक वेळ अशी येते की त्यांच्या नात्यामध्ये दुरावा येतो. (Live in Relationship Rape Case)

त्यानंतर महिलेने पुरुषावर बलात्काराचा आरोप देखील केला. अनेकवेळा लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोपही करण्यात येतो. पण कोर्टाचे म्हणणे आहे की अशा प्रकरणामध्ये पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होत नाही.

सध्याचे प्रकरण म्हणजे राजस्थानमधील एक महिला आणि एक पुरुष चार वर्षांपासून एकत्र राहत होते. त्याचे लग्न झालेले नव्हते. या नात्यातून तिला एक मुलगीही आहे, पण नंतर स्त्री आणि पुरुषाचे नाते बिघडते तर त्यानंतर महिलेने त्या व्यक्तीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने (Rajasthan High Court) या व्यक्तीला जामीन देण्यास नकार दिला आहे.

याच प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी उच्च न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवत त्या व्यक्तीला जामीन मंजूर केला आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले की, जर दोन व्यक्ती एकत्र राहत असतील आणि नंतर संबंध बिघडले तर त्यात बलात्काराचे कोणतेही प्रकरण नाहीये.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT