Arvind Kejriwal Dainik Gomantak
देश

देशातील सर्व डॉक्टरांना भारत रत्न द्या- Arvind Kejriwal

अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत ही मागणी केली आहे.

दैनिक गोमन्तक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी कोरोना(Covid 19) साथीच्या विरोधात लढा देणार्‍या सर्व डॉक्टर आणि परिचारिकांना यावर्षी भारतरत्न(BharatRatn) मिळावे अशी मागणी केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांना पत्र लिहीत ही मागणी केली आहे.

यामुळे संपूर्ण देश आनंदी होईल, जे लोक आपल्या जीवनाची आणि कुटुंबाची चिंता न करता लोकांची सेवा करतात त्यांना हा सन्मान मिळेल. ही 'शहीद' डॉक्टरांना खरी श्रद्धांजली ठरेल. अशा आशयाचे पत्र त्यांनी पंतप्रधाना लिहले आहे.

तसेच त्यांनी ट्विट करत, "यावर्षी "भारतीय डॉक्टरानां " भारतरत्न मिळाला पाहिजे. “इंडियन डॉक्टर” म्हणजे सर्व डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिक्स. शहीद डॉक्टरांना ही खरी श्रद्धांजली ठरेल. जे त्यांचे जीवन आणि कुटुंबाची चिंता न करता सेवा करतात त्यांच्यासाठी हा सन्मान असेल. संपूर्ण देश यासह आनंदी होईल. " अशी भावना व्यक्त केलीय आहे.

तर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांनी देशातील डॉक्टर, परिचारिका आणि पॅरामेडिकल कर्मचार्‍यांनी त्यांच्या जीवावर खेळून लोकांचे प्राण वाचवले आहेत, त्यांना नक्कीच आदर मिळायला हवा.असे मत मांडले आहे.

जूनच्या मध्यात इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनव्हायरसच्या दुसर्‍या लाटेमध्ये एकूण 730 डॉक्टरांचा जीव गेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

Rohit Sharma: ‘देशाला तुझी अजून 5 वर्षे गरज...’, रोहित शर्माच्या निवृत्तीवर भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

Goa Crime News: वास्कोत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बिहारचे तिघे अटकेत; लाखोंचा मुद्देमाल जप्त

एका वर्षात चौथा मृत्यू, झोपेतच विद्यार्थ्याचा गेला जीव; BITS Pilani कॅम्पसमधील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT