Earthquake Dainik Gomantak
देश

Earthquake: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सलग दुसरा भूकंप, दिल्लीनंतर बंगालच्या उपसागरात जाणवले भूकंपाचे धक्के

राजधानी दिल्लीनंतर आता बंगालच्या उपसागरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

दैनिक गोमन्तक

देशात दिल्लीनंतर आता बंगालच्या उपसागरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.5 इतकी मोजली गेली आहे. पण भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.

सकाळी अकराच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी हा दुसरा भूकंप आहे. यापूर्वी दिल्लीत 3.8 रिश्टर स्केलचा भूकंपाचे धक्के जाणवले होते.

  • 5 डिसेंबरलाही भूकंप झाला होता

यापूर्वी 5 डिसेंबर रोजी बंगालच्या उपसागरात सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, सकाळी 8.32 वाजता भूकंप झाला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.1 असल्याचे सांगण्यात आले. हा भूकंप कोलकात्यापासून 409 किमी दूर बंगालच्या उपसागरात आला. त्याचे केंद्र जमिनीच्या आत 10 किमी होते. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.1 इतकी होती.

  • भूकंप कसे होतात?

पृथ्वीच्या (Earth) खाली असलेल्या प्लेट्स खूप हळू फिरतात. दरवर्षी या प्लेट्स त्यांच्या जागेपासून 4-5 मिमी हलतात. या दरम्यान काही प्लेट कुणाच्या हातून निसटते तर काही कुणाच्या खालीून घसरते. या दरम्यान, प्लेट्सच्या टक्करमुळे भूकंप होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cooch Behar Trophy: 'अव्वल'साठी गोवा मैदानात, कुचबिहार क्रिकेट स्पर्धेत चंडीगडविरुद्ध लढत

गोव्यात पोट भरणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणावर प्राणघातक हल्ला; झारखंडच्या संशयिताला पणजीत अटक

Goa Today News Live: सर्वत्र खंडणी, भ्रष्टाचार! गोव्यातील आणखी एका भाजप नेत्याचा सरकारवर आरोप; केजरीवालांनी शेअर केला व्हिडिओ

Bicholim: डिचोली तालुक्यात भाजी, मिरची लागवडीची लगबग; दीडशेहून अधिक हेक्टर क्षेत्रात उत्पादन शक्य

Mapusa: म्हापशातील कोमुनिदाद प्रशासक इमारत कमकुवत, शासनाकडून दखल नाही; कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका

SCROLL FOR NEXT