Death  Dainik Gomantak
देश

Goa Crime: पत्नीने दुसरे लग्न केलं अन् पतीला डिप्रेशन आलं; झारखंडच्या मजुराने गोव्यात उचलले टोकाचे पाऊल

Goa Crime News: हेलिकॉप्टरच्या साहाय्याने सुरेशचा मृतदेह गोव्याहून रांचीला नेण्यात आला.

Pramod Yadav

गोव्यात कामाला असणाऱ्या झारखंड येथील मजुराने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पत्नीने दुसरे लग्न केले आणि मानसिक धक्का बसल्यामुळे २५ वर्षे मजुराने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी (१७ जानेवारी) ही घटना घडली.

सुरेश मरांडी (वय २५, रा. लिट्टीपार, रांची) असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश गेल्या तीन वर्षांपासून पत्नीसह गोव्यात मजुरीचे काम करत होता. मात्र वर्षभरापूर्वी सुरेशची पत्नी गोव्याहून आई-वडिलांच्या घरी परतली आणि दुसरे लग्न केले. यामुळे सुरेश नेहमी चिंतेत असायचा आणि तो डिप्रेशनमध्ये गेला.

गेल्या शुक्रवारी त्याने दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्यासोबत काम करणाऱ्या इतर मजुरांनी त्याच्या घरच्यांना माहिती दिली. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने सुरेशचा मृतदेह गोव्याहून रांचीला नेण्यात आला. रांचीहून रुग्णवाहिकेच्या मदतीने मृतदेह मंगळवारी रात्री घरी दाखल झाला.

लिट्टीपाराचे आमदार हेमलाल मुर्मू यांनी सुरेशच्या घरच्यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आमदारांनी कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच मृतदेहाच्या अंतिम संस्कारासाठी कुटुंबीयांना आर्थिक मदत केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asha Bhosale Passed Away: आशाताई भोसले यांचे निधन, चिरंजीव आनंद भोसले यांनी दिली माहिती

Maratha history: प्रतापगडचा रणसंग्राम: शिवरायांच्या गनिमी काव्याने अफजलखानाचा माज उतरवला!

Bicholim: 'सिग्नल' बनले शोभेची वस्तू, डिचोली बगलमार्गावर यंत्रणा कार्यान्वित कधी होणार?

Canacona municipal election: काणकोण पालिका निवडणूक; इच्छुक उमेदवार लागले कामाला, गुडघ्याला बाशिंग बांधून तयार

Margao parking project: मडगावात पार्किंग प्रकल्प अजूनही कागदावरच, वाहतूक कोंडीची समस्या वाढली; आरक्षित जागा कचऱ्याचा ढिगारा, प्रशासनावर टीका

SCROLL FOR NEXT