Gandhi family Dainik Gomantak
देश

'गांधी कुटुंबाशिवाय पक्ष चालला': काँग्रेस नेते अश्विनी कुमार

दैनिक गोमन्तक

पाच राज्यांतील दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, काँग्रेसचे (Congress) माजी नेते अश्विनी कुमार यांनी माध्यमाला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले की, 'लोकांनी सध्याच्या नेतृत्वाला नाकारले आहे.' (Congress leader Ashwini Kumar has said that the party was running without the Gandhi family)

ते पुढे म्हणाले की, ‘बदल व्हायचे असते तर इतक्या वर्षांच्या पराभवानंतर घडले असते. परंतु दोन्हीपैकी अद्याप काहीही झाले नाही. विशेष म्हणजे मला कोणतेही विधायक बदल होतील असं वाटत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे घराणे, जे म्हणेल तेच अंतिम. असा काँग्रेस पक्षाचा इतिहास राहीला आहे. गेल्या अनेक वर्षांत सोनिया गांधींनी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व अत्यंत सक्षमपणे केले आहे. त्याआधीही गांधी घराण्यातील सदस्यांनी काँग्रेसचे नेतृत्त्व केले आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून लोक सातत्याने काँग्रेसचा पराभव होत आहेत.’

तसेच, यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, गांधी कुटुंबाने नेतृत्वाच्या भूमिकेपासून दूर जाण्याची आणि दुसऱ्याला संधी देण्याची वेळ आली आहे. 8 वर्षांनंतरही पक्षाच्या अधोगतीची कारणे कळली नाहीत का?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT