Medicine  Dainik Gomantak
देश

Pharma Company License Cancelled: केंद्र सरकारची मोठी कारवाई! 18 फार्मा कंपन्यांचे लायसन्स रद्द

बनावट आणि निकृष्ट औषधे बनवणाऱ्या फार्मा कंपन्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Pharma Company License Cancelled:  गेल्या वर्षी उजबेकिस्तानमध्ये भारतीय कंपनीचे कफ सिरप प्यायल्याने 18 मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारत सरकारकडून औषध उत्पादन आणि निर्मिती कंपन्यांची चांगलीच तपासणी केली जात आहे.

बनावट आणि निकृष्ट औषधे बनवणाऱ्या फार्मा कंपन्यांवर मोठी कारवाई केली जाणार आहे. केंद्र सरकारने मंगळवारी (28 मार्च) केलेल्या कारवाईमध्ये 18 फार्मा कंपन्यांचे लायसन्स रद्द केले आहे.

या कंपन्यांवर बनावट आणि निकृष्ट औषध बनवल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित कंपन्यांना उत्पादन थांबवण्याचे सांगण्यात आले आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून अनेक औषध कंपन्यांची तपासणी केली जात आहे.

केंद्र सरकार आणि राज्याच्या आरोग्य पथकांनी 20 राज्यांतील औषध उत्पादन कंपन्यांची तपासणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. गेल्या 15 दिवसांपासून ही मोहीम सुरू होती.

अनेक देशांमधुन भारतीय औषधांमुळे होणारे मृत्यू आणि आजारांच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर हे छापे टाकण्यात आले होते.

गेल्या महिन्यात गुजरातमधील फार्मा कंपनी Zydus Lifesciences ने अमेरिकेतून (America) जेनेरिक औषधाच्या 55 हजाराहून अधिक बाटल्या परत मागवल्या होत्या. औषध तपासणीत हे औषध फेल ठरले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sancoale: पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला, खोटं सांगून केलं दुसरं लग्न; सांकवाळच्या प्रभारी सरपंचांवर गुन्हा दाखल

Goa Politics: '..राहुल गांधींकडे सर्व प्रकार मांडणार'! अमित पाटकर यांनी दिली माहिती; काँग्रेस, NSUI मधील वाद शिगेला

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’त विद्यार्थी मृत,कॅम्पसमधील धक्कादायक घटना; पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT