Train Dainik Gomantak
देश

...अन् तुटलेला हात घेऊन तरुण रुग्णालयाकडे धावला, बिहारच्या भागलपूरमध्ये नेमकं घडलं काय?

भागलपूर जिल्ह्यात चालत्या ट्रेनमधून पडल्याने एका व्यक्तीला हात गमवावा लागला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Manish Jadhav

Bihar: बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भागलपूर जिल्ह्यात चालत्या ट्रेनमधून पडल्याने एका व्यक्तीला हात गमवावा लागला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

रविवारी रात्री सुलतानगंज रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. या घटनेनंतर फुली डुमर गावातील सुमन कुमार यादवने तुटलेला हात घेऊन हॉस्पिटलकडे गाठले.

दरम्यान, सुलतानगंज रेल्वे पोलिस स्टेशनच्या स्थानिक जीआरपी कर्मचाऱ्यांनी पीडित व्यक्तीची भेट घेतली आणि त्याला सुलतानगंज येथील रेफरल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी (Doctors) त्याला पुढील उपचारासाठी जेएलएन मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, भागलपूर येथे हालवले आहे.

“चालत्या ट्रेनमधून पडलेल्या आणि हात गमावलेल्या एका व्यक्तीला आम्ही वाचवले आहे. त्याला रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले आहे.

त्याचबरोबर पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयांना अपघाताविषयी कळवण्यात आले आहे,” असे जीआरपी सुलतानगंजचे एसएचओ यांनी सांगितले.

दुसरीकडे, या वर्षी ऑगस्टमध्ये मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खरगोनमध्ये एका 4 वर्षीय मुलीचा हात मोटारसायकलच्या चाकात अडकल्याने तुटला होता. तुटलेला हात एका पिशवीत घेऊन कुटुंबीयांनी जखमी मुलीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते.

खरगोन जिल्ह्यातील चित्तोडगड-भुसावळ राज्य महामार्गावर हा अपघात झाला होता. शहरातील एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर मुलीला इंदूरला रेफर करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: लग्नाच्या मांडवात रंगला 'दहीहंडी'चा थरार! वरमाला घालताना नवरदेव-नवरीची कसरत पाहून पाहुणेही चक्रावले, व्हिडिओ तुफान व्हायरल

VIDEO: 8 चौकार, 7 षटकार... IPL 2026 पूर्वी अभिषेक शर्माचा 'रुद्र अवतार', 42 चेंडूत ठोकल्या 94 धावा, पाहा व्हिडिओ

VIDEO: ..अन बघता बघता काजूबागेत आग पसरली! विर्नोडा परिसरात धुराचे साम्राज्य

स्वतःची कविता वाचली, म्हणे गंगेत घोडं न्हालं! कविसंमेलनात कवितेला खरेच महत्त्व उरलेय?

कोकणात जाळपोळ केली, पावसाळ्यात तुर्क माघारी फिरले आणि मराठ्यांनी त्यांना कापून काढले; बहमनी सैन्य 'गोव्या'वर आक्रमण करण्यास निघाले..

SCROLL FOR NEXT