Bengaluru bandh announced on September 26, struggle over Cauvery Water Dispute. Dainik Gomantak
देश

Cauvery Water Dispute: 26 सप्टेंबरला बंगळुरू बंदची घोषणा, कावेरी मुद्द्यावरून पुन्हा संघर्ष

Bengaluru Bandh: राज्य मंत्रिमंडळाने शुक्रवारी 195 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या अंतर्गत केंद्राकडून नुकसान भरपाई मागण्याचा प्रस्ताव मान्य केला.

Ashutosh Masgaunde

Bengaluru bandh announced on September 26, struggle over Cauvery Water Dispute:

कावेरीचे पाणी तामिळनाडूला देऊ नये, या मागणीसाठी कर्नाटकातील विविध संघटनांनी मंगळवार, २६ सप्टेंबर रोजी बेंगळुरू बंदची हाक दिली आहे.

शहरातील फ्रीडम पार्क येथे अनेक संघटनांच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. शेतकरी नेते कुरुबुरु शांताकुमार यांनी बंदचा निर्णय जाहीर करत विविध संघटनांकडून सहकार्य मागितले.

शांताकुमार यांनी शाळा आणि महाविद्यालये, फिल्म चेंबर्स आणि आयटी कंपन्यांना सुट्टी जाहीर करण्याचे आवाहन केले. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणीही त्यांनी सरकारकडे केली.

15 संघटनांचा बंदला पाठींबा

आम आदमी पार्टी (आप), अनेक निवासी कल्याणकारी संघटना आणि कन्नड समर्थक गटांसह १५ हून अधिक संघटना या बैठकीला उपस्थित होत्या. कावेरी मुद्यावर शनिवारी बेंगळुरूमध्ये विविध गटांनी निदर्शने केली आणि अनेक ठिकाणी वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला.

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मान्य करून तामिळनाडूला पाणी सोडण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने शुक्रवारी घेतला.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याच वेळी, सर्वोच्च न्यायालयाने 21 सप्टेंबर रोजी तामिळनाडूला 5,000 क्युसेक पाणी सोडण्याच्या कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता.

195 तालुक्यांमध्ये दुष्काळ

तामिळनाडूला पाणी सोडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध करत रविवारी मंड्यामध्ये विविध संघटना बंद पाळत आहेत.

कर्नाटक सरकारने राज्यात पाऊस नसल्याचं कारण देत कावेरीचं पाणी सोडण्यास असमर्थता व्यक्त केली होती. सिद्धरामय्या यांनी ऑगस्टमध्ये राज्यात 73 टक्के कमी पाऊस झाल्याचे सांगितले होते.

राज्य मंत्रिमंडळाने शुक्रवारी 195 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या अंतर्गत केंद्राकडून नुकसान भरपाई मागण्याचा प्रस्ताव मान्य केला.

पीक नुकसान सर्वेक्षणाच्या आधारे, राज्य सरकारने म्हटले होते की 161 तालुके गंभीर दुष्काळाचा सामना करत आहेत आणि 34 तालुके मध्यम दुष्काळाचा सामना करत आहेत.

राज्यात आंदोलने सुरूच

कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा म्हणाले की, पोलीस कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. म्हैसूर, मंड्या, चामराजनगर, रामनगरा, बेंगळुरू आणि राज्याच्या इतर भागात कावेरी नदी खोऱ्यात शेतकरी संघटना आणि समर्थक कन्नड संघटनांनी निषेध व्यक्त करून संताप व्यक्त केला. आंदोलकांनी राज्य सरकारला शेजारच्या राज्याला पाणी न सोडण्याची विनंती केली आहे.

कर्नाटकचे म्हणणे आहे की, ते कावेरी नदी खोऱ्यातील उभ्या पिकांसाठी सिंचनाच्या पाण्याच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पाणी सोडण्याच्या स्थितीत नाही कारण मान्सूनच्या कमी पावसामुळे पाण्याची कमतरता आहे. शुक्रवारी, चित्रदुर्ग, बल्लारी, दावणगेरे, कोप्पल आणि विजयपुरा यांसारख्या जिल्ह्यांमध्येही निदर्शने झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 WC 2026: आफ्रिकेचा 'विजयी षटकार'! वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवत सेमीफायनलचं तिकीट केलं पक्क; मार्करमची तुफानी खेळी ठरली निर्णायक VIDEO

Shirgao Lairai Jatra: ''6 मार्चपर्यंत क्राउड मॅनेजमेंट प्लॅन सादर करा'', शिरगाव जत्रेबाबत हायकोर्टाचा कडक आदेश; चेंगराचेंगरी टाळण्यासाठी सरकारला अल्टिमेटम

Budh Vakri 2026: 23 दिवसांचा 'राजयोग'! बुधाची वक्री चाल पालटणार 'या' 3 राशींचं आयुष्य; 21 मार्चपर्यंत बरसणार पैशांचा पाऊस

Goa Crime: मायणा-कुडतरीत खळबळ! फूस लावून पळवून अल्पवयीन मुलीचं अपहरण, संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल; पालकांचा गंभीर आरोप

Operation Sindhur 2.0: 'ऑपरेशन सिंदूर 2.0' ने उडणार पाकड्यांचा थरकाप, भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडचा थेट इशारा; शत्रूच्या छाताडावर नाचणार 'भैरव' सैन्य! VIDEO

SCROLL FOR NEXT