Nitin Gadkari Dainik Gomantak
देश

'अटलबिहारी वाजपेयी आणि जवाहरलाल नेहरु आदर्श नेते: नितीन गडकरी

भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना आत्मपरीक्षण करण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihar Vajpayee) आणि जवाहरलाल नेहरु (Jawahar Lal Nehru) यांचे आदर्श नेते म्हणून वर्णन करताना भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना आत्मपरीक्षण करण्यास सांगितले आहे. नेत्यांनी आत्मनिरीक्षणासह आदराने वागले पाहिजे. गडकरी पुढे म्हणाले की, वाजपेयी आणि नेहरु हे भारताचे दोन आदर्श नेते होते आणि दोघेही म्हणत असत की, आपण सर्वांनी लोकशाहीच्या सन्मानाचे पालन केले पाहिजे. माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत गडकरी म्हणाले की, हे दोघेही महान नेते लोकशाहीमध्ये आपले कार्य सन्मानाने करत. ते यावेळी असेही म्हणाले, "अटलजींचा वारसा आमची प्रेरणा आहे, आणि पंडित जवाहरलाल नेहरु यांचे भारतीय लोकशाहीमध्ये मोठे योगदान आहे."

भाजपचे ज्येष्ठ नेते नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये निर्माण झालेल्या गतिरोधाबद्दल बोलत होते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शेतीविषयक कायदे, वाढते इंधन दर, पेगॅसस समस्येशी संबंधित मुद्द्यावर बराच गदारोळ झाला आणि त्यामुळे संपूर्ण अधिवेशनात गतिरोध निर्माण झाला. महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते असतानाची आठवण करुन देताना गडकरी म्हणाले की, एक वेळ होती जेव्हा आम्ही सभागृहात सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्यासाठी विरोधी पक्षाची भूमिका तडफेने मांडत. दरम्यान मी एकदा अटलजींना भेटलो होतो. त्यावेळी त्यांनी मला सांगितले की, लोकशाहीत काम करण्याचा हा मार्ग नाही. लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवणे महत्वाचे आहे.

भूमिका बदलत रहा

गडकरी पुढे म्हणाले की, ''सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. जो आज सत्ताधारी पक्ष आहे आणि उद्या तो विरोधी पक्ष असेल, जो विरोधी पक्ष आहे तो सत्ताधारी पक्ष असेल. अशा परिस्थितीत आपली भूमिका बदलत राहावी. मी माझ्या आयुष्यातील अनेक वर्षे विरोधात काम केले आहे. लोकशाहीत आपण कुठेतरी प्रत्येकाने मर्यादा पाळून पुढे जायला हवे. संसदेत नुकत्याच झालेल्या व्यत्ययामुळे मी दु: खी होतो. काँग्रेस पक्षाच्या स्थितीबद्दल बोलताना ते म्हणाले की, यशस्वी लोकशाहीमध्ये मजबूत विरोध पक्ष आवश्यक आहे. गडकरींनी सत्ताधारी आणि विरोधकांना लोकशाहीचे दोन चाके असे वर्णन केले. नेहरुजींनी, वाजपेयीजींचा नेहमीच आदर केला त्याचबरोबर अटलजींनी विरोधी पक्षात असताना नेहरुजींचा विरोध देखील केला. त्यामुळे काँग्रेस पक्ष विरोधी पक्षाप्रमाणे मजबूत झाला पाहिजे. काँग्रेसने जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करावे अशी माझी इच्छा आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa History: 1380 ते 1470 मध्ये संपूर्ण गोव्याची भरभराट झाली; विजयनगरचा प्रतापी सम्राट देवराय

Australian Open 2026: नव्या युगाची नांदी, 'अल्काराज' ठरला टेनिसचा नवा किंग! नोवाक जोकोविचचा पराभव करुन पटकावलं पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद VIDEO

Balochistan Violence: दमन आणि अत्याचाराचा पाकड्यांचा इतिहास...! बलुचिस्तानमधील हिंसाचारावरुन चिखलफेक करणाऱ्यांना भारताचं चोख प्रत्युत्तर

Budh Gochar 2026: फेब्रुवारीत बुध ग्रहाची 'ट्रिपल चाल' पालटणार नशीब! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Illegal Beef Trafficing: चोर्ला घाटात मध्यरात्री थरार! पाच गायींच्या मांसासह दोन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात; 20 वर्षीय तरुणाला बेड्या

SCROLL FOR NEXT