Jasprit Bumrah Dainik Gomantak
देश

Asia Cup 2025 Final: फायनलमध्ये बुमराहचा स्वॅग! 'ती' विकेट घेऊन सेलिब्रेशनने काढला राग; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तूफान व्हायरल VIDEO

Jasprit Bumrah Wicket Celebration: बुमराहने रौफला बाद केल्यानंतर त्याच्याच अंदाजात सेलिब्रेशन करुन चाहत्यांना आणि रौफलाही जोरदार प्रत्युत्तर दिले.

Manish Jadhav

Jasprit Bumrah Wicket Celebration: भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी करत क्रिकेट चाहत्यांचे मन जिंकले. सध्या या हाय होल्टेज सामन्यादरम्यान सर्वात जास्त चर्चा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या अनोख्या सेलिब्रेशनची होत आहे. बुमराहने पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हारिस रौफला बोल्ड करुन पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर त्याच्याच स्टाईलमध्ये सेलिब्रेशन करुन बुमराहने दमदार उत्तर दिले.

हारिस रौफची अभद्र कृती

दरम्यान, बुमराहने हारिस रौफची विकेट घेतल्यानंतर जो इशारा केला, त्याची सुरुवात सुपर-4 फेरीतील भारत-पाक सामन्यात रौफनेच केली होती. त्या सामन्यात भारताच्या डावादरम्यान रौफ बाउंड्रीजवळ क्षेत्ररक्षण करत होता. तेव्हा काही भारतीय चाहत्यांनी त्याला विराट कोहलीच्या नावाने चिडवण्याचा प्रयत्न केला. या चिडवण्याला उत्तर म्हणून रौफने प्रेक्षकांकडे पाहत फायटर जेट क्रॅश होण्याचा इशारा केला होता. हे वर्तन आक्षेपार्ह मानले गेले आणि या 'अभद्र' कृतीबद्दल आयसीसीने (ICC) रौफला नंतर 30 टक्के मॅच फीचा दंड ठोठावला.

बुमराहचा तगड सेलिब्रेशन

या फायनल सामन्यात रौफला बुमराहने बोल्ड केले आणि लगेच त्याच्या आक्षेपार्ह वर्तनाचा हिशेब चुकता केला. बुमराहने रौफला बाद केल्यानंतर त्याच्याच अंदाजात सेलिब्रेशन करुन पाकिस्तानी चाहते आणि रौफलाही जोरदार प्रत्युत्तर दिले. बुमराहचा हा आत्मविश्वासपूर्ण आणि वेगळा अंदाज चाहत्यांना खूप आवडला आणि सोशल मीडियावर तो लगेच व्हायरल झाला.

पाकिस्तानी फलंदाजांची पुन्हा नाचक्की

फायनलमध्ये पहिल्यांदा फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानी संघाला 12व्या षटकापर्यंत 113 धावांवर केवळ 1 गडी गमावून चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र, त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले. विशेषतः भारतीय फिरकी गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजीची पूर्णपणे धूळधाण उडवून दिली. शेवटच्या षटकात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 146 धावांवर ऑल आऊट झाला. टीम इंडियासाठी सर्वाधिक 4 बळी कुलदीप यादवने घेतले. त्याचबरोबर जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले. विशेष म्हणजे, पाकिस्तानचे पहिले 8 फलंदाज भारतीय फिरकीपटूंनीच बाद केले, तर बुमराहने शेवटचे दोन महत्त्वपूर्ण बळी घेत पाकिस्तानचा डाव संपवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "काँग्रेसमध्ये प्रवेश करणं हीच सर्वात मोठी रिस्क!" विद्यार्थिनीच्या उत्तरानं राहुल गांधी अवाक; संवादाचा व्हिडिओ व्हायरल

Crime News: "दोन मृतदेह अन् रक्तानं माखलेलं घर!" नराधम नवऱ्यानं बायको, सासूसह सासऱ्यावर केला जीवघेणा हल्ला; संशयानं सुखी कुटुंबाची राखरांगोळी

Navpancham Drishti Yog 2026: "धाडसी निर्णय घ्या अन् मालामाल व्हा!" गुरु-वरुणचा नवपंचम दृष्टी योग, 'या' 5 राशींवर होणार धनाचा वर्षाव; घरात नांदणार सुख-समृद्धी

Iran US Tension: 'पाकिस्तान आमचा मित्र, पण निष्पक्ष नाही', इराणनं पाकड्यांना दाखवली जागा; मध्यस्थ म्हणून स्वीकारण्यास नकार

Horoscope 2026: घर घेण्याचं स्वप्न साकार होणार, जमीन व्यवहारातून मिळणार अफाट पैसा; 'या' राशीवर शनिदेवाची विशेष कृपा

SCROLL FOR NEXT