Foreign Minister S. Jaishankar
Foreign Minister S. Jaishankar Dainik Gomantak
देश

All Party Meeting: अफगाणिस्तान मुद्यावर सर्व पक्षांची सहमती; एस. जयशंकर म्हणाले...

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानची (Afghanistan) परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. तालिबानने (Taliban) अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून काबूलसह (Kabul) जवळपास सर्व प्रांतामध्ये अराजकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, गुरुवारी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले की, सर्वपक्षीय बैठकीत 31 पक्षांचे 37 नेते उपस्थित होते. अफगाणिस्तान मुद्द्यावर केंद्र सरकार आणि सर्व पक्षांचे सहमती झाली आहे. या बैठकीत असेही सांगण्यात आले की, अफगाणिस्तानमधून आतापर्यंत किती लोकांना भारतात आणण्यात आले आहे.

सुमारे साडेतीन तास चाललेल्या या बैठकीची सुरुवात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (Foreign Minister S. Jaishankar) यांनी केली. त्यांनी विरोधी पक्षांना अफगाणिस्तानमधील परिस्थिती आणि भारत सरकारने उचललेल्या पावलांची माहिती दिली. एस जयशंकर म्हणाले की, आतापर्यंत अफगाणिस्तानातून 565 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. ज्यात दूतावासाचे 175 कर्मचारी, 263 इतर भारतीय नागरिक, अफगाणिस्तानचे 112 नागरिक हिंदू आणि शीख आणि 15 इतर देशांचे नागरिक यांचा समावेश आहे. तालिबानबाबत भारत सरकारच्या भूमिकेबद्दल विचारले असता, एस जयशंकर म्हणाले की, अफगाणिस्तानमधील परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही, ती अजूनही अराजकता निर्माण करणारी आहे.

अफगाणिस्तान मुद्द्यावर विरोधी पक्ष आणि सरकारचे एक मत

एस जयशंकर म्हणाले की, या बैठकीत हे समोर आले आहे की, केंद्र सरकार आणि विरोधकांचे अफगाणिस्तान मुद्द्यावर समान मत आहे. आपण सर्वजण अफगाणिस्तान आणि तिथे अडकलेल्या लोकांबद्दल चिंतित आहोत. तेथे अडकलेल्या भारतीयांना देव शक्ती मिशनद्वारे परत आणले जात आहे. जे अजूनही तेथे अडकले आहेत त्यांना लवकरच बाहेर काढले जाईल. ज्या अफगाण नागरिकांना भारतात यायचे आहे त्यांच्यासाठी भारत सरकारने ई-व्हिसा धोरण आणले आहे.

स्पेशल सेलला इतके कॉल, मेसेज आणि ईमेल आले

या दरम्यान परराष्ट्र सचिव हर्ष शृंगला यांनी एका अहवालाचे सादरीकरणही केले. ज्यात त्यांनी सांगितले की, आतापर्यंत परराष्ट्र मंत्रालयाने स्थापन केलेल्या विशेष सेलमध्ये मदतीसाठी 3,014 कॉल आले आहेत आणि त्या सर्वांना उत्तरे देण्यात आली आहेत. त्याच वेळी, 7,826 लोकांनी व्हॉट्सअॅपद्वारे आणि 3,102 लोकांशी ईमेलद्वारे संपर्क साधला गेला, ज्याचे उत्तर देण्यात आले आहे.

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या व्यतिरिक्त, केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेतील सभागृह नेते पीयूष गोयल आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी हे देखील संसद भवनातील परिशिष्टामध्ये उपस्थित होते. त्याचबरोबर, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी देखील या बैठकीत सहभागी झाले आहेत. याशिवाय तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधीही या बैठकीला उपस्थित राहिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT