pm modi Dainik Gomantak
देश

Agniveer New Rules: अग्निवीरांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! वीरमरण आल्यास कुटुंबाला पेन्शन किंवा नोकरी देण्याची तयारी; लवकरच नियमात होणार बदल

Agniveer Pension And Job Scheme Updates: अग्निपथ योजनेंतर्गत देशाची सेवा करणाऱ्या अग्निवीरांसाठी केंद्र सरकार लवकरच एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा नियम लागू करण्याच्या तयारीत आहे.

Manish Jadhav

Agniveer Pension And Job Scheme Updates: अग्निपथ योजनेंतर्गत देशाची सेवा करणाऱ्या अग्निवीरांसाठी केंद्र सरकार लवकरच एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. या नव्या योजनेवर सध्या वेगाने काम सुरु असून, अंतिम मंजुरीनंतर ती देशभरात लागू केली जाईल. लष्कर, वायुसेना आणि नौदलात सेवा बजावताना देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या म्हणजेच शहीद होणाऱ्या अग्निवीरांच्या कुटुंबांना या योजनेचा थेट आणि मोठा फायदा होणार आहे.

देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या या तरुण जवानांना नियमित सैनिकांप्रमाणेच 'शहीद' दर्जा देऊन सन्मानित करणे आणि त्यांच्या पश्चात कुटुंबाला पेन्शन (Pension) किंवा शासकीय नोकरी देण्याची तरतूद या प्रस्तावात करण्यात आली. संरक्षण मंत्रालयाच्या मंजुरीनंतर या ऐतिहासिक निर्णयाची अधिकृत घोषणा केली जाईल.

सध्याच्या नियमांनुसार, चार वर्षांच्या कार्यकाळात कर्तव्य बजावताना अग्निवीराला वीरमरण आल्यास त्यांच्या कुटुंबाला केवळ विम्याची रक्कम मिळते. दोन वेगवेगळ्या योजनांतर्गत सुमारे एक कोटी रुपयांपर्यंतचा हा विमा दिला जातो. मात्र, नियमित सैनिकांप्रमाणे त्यांच्या कुटुंबाला इतर कोणतीही पेन्शन, नोकरी किंवा सवलती मिळत नव्हत्या. या पार्श्वभूमीवर, संरक्षण मंत्रालयाशी संबंधित संसदीय समितीने नुकतीच एक महत्त्वपूर्ण शिफारस केली.

देशासाठी बलिदान देणारे अग्निवीरही नियमित सैनिकांप्रमाणेच मातृभूमीचे रक्षण करतात, त्यामुळे त्यांच्या वीरमरणानंतर त्यांच्या कुटुंबीयांनाही तेवढाच सन्मान, पेन्शन आणि नोकरीच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, जेणेकरुन त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरळीत होऊ शकेल, असे समितीने म्हटले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय संरक्षण मंत्रालय या शिफारशीबाबत अत्यंत सकारात्मक असून, लवकरच यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. अग्निपथ योजनेला आता जवळपास चार वर्षे पूर्ण होत आली असून, जवानांची पहिली बॅच लवकरच निवृत्त होणार आहे. सद्यस्थितीत तिन्ही दलांमध्ये मिळून सुमारे दीड लाख अग्निवीर कार्यरत आहेत, ज्यामध्ये एकट्या भूदलात 1.25 लाख जवान आहेत. दरवर्षी 45 ते 50 हजार नव्या अग्निवीरांची भरती केली जाते. आतापर्यंत कर्तव्यावर असताना साधारण 25 अग्निवीरांनी देशासाठी आपले प्राण गमावले आहेत. या नव्या नियमामुळे भविष्यात देशासाठी बलिदान देणाऱ्या अग्निवीरांच्या वारसांना मोठा सामाजिक आणि आर्थिक आधार मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

...अन् सर्वजण आकाशाकडेच पाहत राहिले! क्रिकेट सामन्यात पहिल्यांदाच घडलं असं काही; चाहत्यांनी पाहिला अद्भुत नजारा Watch Video

Ganesh Idol Sellers Registration: गणेशमूर्ती विक्रेत्यांना नोंदणीसाठी मुदतवाढ, पर्यावरण विभागाकडून संकेतस्थळ सुरू ठेवण्याचे निर्देश

Goa Karnataka Water Dispute: म्हादईनंतर आता तिळारीच्या पाण्यावरही कर्नाटकाची नजर; गोव्याच्या जलहक्कांसमोर नवे संकट, सत्ताधारी-विरोधक मात्र शांतच!

Delhi Red Fort Blast: दिल्ली बॉम्बस्फोटामागे 'अल-कायदा'! UNच्या अहवालातून मोठा खुलासा; 'जैश'चे नाव पुढे करुन खेळला खतरनाक खेळ

झेंडा फडकवला अन् खोल दरीत पडून अडकला! 7 तासांनंतर युवकाची सुखरूप सुटका, बडसरे डोंगरावरील घटना

SCROLL FOR NEXT