blog 
ब्लॉग

वडूकर देश, मिथके, प्रादेशिक मांडणी

दैनिक गोमन्तक

वडुकर देश जिथे आहे तिथेच आपल्यापैकी बहुतेकांची मुळं आहेत,. पण आपल्या पूर्वजांच्या त्या भूमीविषयी जाणुन घेण्यापूर्वी आपण काही गैरसमज दूर करायला हवेत. पहिलं म्हणजे व्यवसाय आणि आपण बाळगलेला जातीचा समुह शिक्का यांच्यातील खोटा संबंध.

चातुर्वर्ण वर्गीकरणाचा व्यवसायाशी काहीही संबंध नाही, ब्राम्हण हे व्याख्येने पुरोहित नव्हते आणि क्षत्रिय योद्धे नव्हते, वगैरे आपण अकाट्य पुराव्यांच्या आधारे आधीच स्पष्ट केले आहे.

काणे यांनी स्पष्टपणे म्हटल्याप्रमाणे हे सर्व ''गडद किंवा गोऱ्या रंगाची त्वचा असलेल्या लोकांचे गट'' होते, हे सर्व वर्णाविषयी होते. [काणे, १९४१ : धर्मशास्त्राचा इतिहास,खंड २, भाग१,२५] म्हणजे वर्गीकरण ''कमी-अधिक प्रमाणात वांशिक व सांस्कृतिक'' होते. [काणे, १९४१: खंड २, भाग १,४८] ब्राम्हणांनी शेवटी बहुसंख्य जागा व्यापून टाकली, हा केवळ काही ऐतिहासिक परिस्थितीचा परिणाम होता. आपण आधी पाहिल्याप्रमाणे दख्खनमधील बहुतेक राजे धनगर होते. [दख्खनचे धनगर राजवंश, १३ ऑगस्ट १७]

पण या क्षणी आपल्याला अधिक महत्त्व आहे ते त्या खोट्या नात्याचा आणखी एक परिणाम. वडुकर, क्षत्रिय आणि ब्राम्हण हे तिघेही पशुपालक शेतकरी होते, असे अनेकदा अभ्यासकांना वाटते. चातुर्वर्ण मिथकाचे खंडन केल्याने, कोणत्याही दोन गटांनी एकाच व्यवसायाचे अनुसरण केले हे दोन्ही वांशिकदृष्ट्या समान होते असा निष्कर्ष काढण्याचे कारण नाही.

वडुकर, क्षत्रिय आणि ब्राम्हण, यांची सुरुवात शिकारी, संग्रहक, संकलक आणि कालांतराने पशुपालक-शेतकरी म्हणून पुढे ते विकसित झाले; बहुधा वेगवेगळ्या वेळी. पण जेव्हा ते भेटले तेव्हा ते सर्व पशुपालक-शेतकरी होते असे दिसते. मात्र,वडुकारांपैकी काही जण शिकारी-संकलक असले तरी त्यांच्यापैकी काही जण आधीपासूनच व्यापारात होते.

क्षत्रिय आणि ब्राम्हण बहुधा ताज्या कुरणाच्या शोधात भारतात आले असावेत. पूर्वीचे काही जण आधीच व्यापारामध्ये गेले होते ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. पण व्यापाराचा ब्राम्हणवर फारसा प्रभाव पड्लेला दिसत नाही. इंडो-गंगेच्या मैदानात आल्यावर ब्राम्हाणंची जी प्रमुख प्रतिमा उमटते ती विरंगुळ्याच्या वर्गाची आहे.

या स्थितीचे रक्षण करण्यासाठी क्षत्रिय, त्यांना खाऊ घालण्यासाठी वैश्य आणि त्यांची सेवा करण्यासाठी शूद्र, त्या बदल्यात ब्राम्हण उरलेल्या तिघांसाठी देवाशी मध्यस्थी करेल, असा चातुर्वर्ण व्यवस्थेचा मूळ हेतू दिसतो.

वडुकर आणि क्षत्रिय यांच्यातील सांस्कृतिक देवाणघेवाणीत पशुपालन हे एक प्रमुख सूत्र होते असे दिसते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे वडुकर ''यव'' (यदव - शेळी पाळणारा) क्षत्रिय शब्दकोशात यदव (यादव - पशुपालक) या नावाने सामावून घेणे हे होय.[साऊथवर्थ,१९९५ :भाषेतून सामाजिक संदर्भाची पुनर्रचना : इंडो-आर्यन आणि द्रविड पूर्वइतिहास, २६६]

दुसरा गैरसमज ''आर्य'' आणि ''द्रविड'' या शब्दांविषयी आहे. ''आर्य'' या शब्दात सामान्यत: क्षत्रिय आणि ब्राम्हण या दोन्ही शब्दांचा समावेश असावा. प्रारंभी प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये ''आर्य'' हा शब्द केवळ ब्राम्हणांचा संदर्भ देत असला, तरी कालांतराने क्षत्रियांना ब्रम्हराष्ट्राचे ''रक्षक'' म्हणून काम करण्यासाठी आर्य पंथात स्वीकारण्यात आले.

आर्यन हा शब्द वापरताना आपण हे लक्षात घेतले पाहिजे. क्षत्रिय आणि ब्राम्हण यांच्यातील वांशिक भेद कायम ठेवण्यासाठी आपण आर्य हा शब्द वापरणे बहुतेक टाळले आहे.

पण त्याहीपेक्षा गोंधळात टाकणारा शब्द म्हणजे द्रविड हा शब्द. अनेक विद्वानांना दख्खन आणि तामीळकाम यांच्यातील विभाजन रेषा दिसत नाही आणि ते विंध्याच्या दक्षिणेकडील संपूर्ण द्वीपकल्पाला एक अस्तित्व मानतात. वडुकर देश आणि तामीळकाम यात फरक न करणे ही केवळ इतिहासाची खिल्ली उडवणारी गोष्ट आहे, हे आत्तापर्यंत आपल्याला चांगलेच ठाऊक आहे.

आणि शेवटी परसह्याद्री कोकणाचे वास्तव आपण स्वीकारले पाहिजे. भूगर्भीय अंदाजा नुसार कोकण किनारपट्टी ख्रिस्तपूर्व ४,००० ते इ.स.पू.२,००० पूर्वी अस्तित्वात नव्हती. [नॉट्स बांधणे, ०९ एप्रिल १७] मौखिक परंपरेचा दाखला देत क्रॉफर्ड आणि आर्कामोन यांनी कोकण किनारपट्टीचे वर्णन केले आहे. [क्रॉफर्ड, १९०९: कोकणातील दंतकथा,२५; फर्नांडिस,१९८१: उमा डेस्क्रिको ई रेलाको दे ''दे ससाटाणा द्वीपकल्प इन इंडियास्टॅटू'' हा ग्रंथ इनेडिटी, ९३] दुसरीकडे कनिंगहॅम ''कुलबर्गा (गुलबर्गा/कलबुर्गी) पासून माडगिरीच्या प्राचीन किल्ल्यापर्यंत आणि किनाऱ्या लगत वेंगुर्ला ते कुंदापूरपर्यंत पसरलेल्या कोकणाचा नकाशा रेखाटतो. (कनिंगहॅम)१८७१: भारताचा प्राचीन भूगोल, खंड.१,५५३) कनिंगहॅमचा निष्कर्ष शमन ह्वुई ली यांनी ह्युन त्सांगच्या भारतातील प्रवासाच्या वर्णनावर (इ.स.६वे ते ७वे शतक) आधारित आहे.

(बील, १९११:शमन ह्वुई ली यांचे ह्युन-त्सियांगचे जीवन) आपण आधी म्हटल्याप्रमाणे सह्याद्रीच्या पलीकडचे स्थलांतर इ.स.पू.१,०००च्या सुमारास सुरू झाले असावे. पण ह्युन त्सांगच्या भेटीपर्यंत ही सह्याद्री आणि किनारपट्टीवरील कोकणाची अखंडता अबाधित राहिलेली दिसते; ह्युन त्सांग ने बाणावासीचा उल्लेख कोकणची राजधानी (?) म्हणून केला आहे.

त्याहीपेक्षा गंमत म्हणजे कार्ले येथील बौद्ध शैलीतील मंदिरांतील शिलालेखांमध्ये वैजयंती (बाणावसी) यांचा उल्लेख ''कोकणकिनारपट्टीवरील शहर'' असा आहे. [बर्गेस एट अल,१८८१: पश्चिम भारतातील गुहा मंदिरातील शिलालेख,२८) समुद्रापासून दख्खनच्या पठाराच्या मध्यभागी कोठेतरी अखंड कोकणी सातत्य असण्याच्या कल्पनेला पुष्टी देणारे बरेच पुरावे आहेत. [कोकण वन्स अपॉनअ टाईम,]

सह्याद्री प्रांतीय कोकण हा वडुकर देशाचा एक महत्त्वाचा भाग होता. आधी म्हटल्याप्रमाणे, उत्तरार्धाच्या पश्चिमेकडील बाजूस उत्तरेला कोनकाक आणि दक्षिणेला कर्णात किंवा कानडा यांचा समावेश होता; ओडिया आणि तामीळकम दरम्यानच्या पूर्वेकडील बाजूस तेलगू देशाने कब्जा केला होता.

[कोनका - द जिग्सॉ पझल,] या नकाशात मर्‍हाट हरवलेला पाहून आश्चर्य वाटून घेऊ नका; कोकण भागात आजच्या काही कानडा प्रदेशासह सर्व काही व्यापले गेले [मराठीचे संस्कृतीकरण,] वडुकर देशाविषयी समजण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिची मूलभूत एकता;सध्याच्या भाषिक राज्यांच्या सीमा भ्रामक असू शकतात. भागवत म्हणतात -''कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र हे तीन प्रदेश भाषेत भिन्न असले, तरी त्यांची संस्कृती एकच आहे. या तिन्ही भागातील डोंगराळ ग्रामीण भागातील पशुपालक संस्कृतीत ही सांस्कृतिक एकता बहरली आहे.'' [भागवत,१९७०:''पाहारिका विहोबा'',पैस,३७]

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोवा काँग्रेसच्या प्रभारी सचिवांचा बैठकांचा धडाका; 'त्या' आमदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन

Sunburn Festival 2024: त्यांनी कॅप्टनसारखे वागावे, बिनबुडाची विधाने करू नये; ‘सनबर्न’ याचिकेवरुन खंवटेंचे प्रत्त्युत्तर

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

SCROLL FOR NEXT