Rashtrakutas in Goa  Dainik Gomantak
ब्लॉग

Rashtrakutas in Goa : गोव्यातील राष्ट्रकूट राजवट

गोमन्तक डिजिटल टीम

सर्वेश बोरकर

राष्ट्रकूट हे बदामी चालुक्यांचे सामंत किंवा सरंजामदार, दंतिदुर्गाच्या राजवटीत त्यांनी चालुक्य कीर्तिवर्मन( दुसरा) चा पाडाव केला आणि आधुनिक कर्नाटकातील गुलबर्गा प्रदेशात साम्राज्य निर्माण केले .

हा वंश ७५३ मध्ये दक्षिण भारतात सत्तेवर आलेला मन्याखेतचा राष्ट्रकूट म्हणून ओळखला जातो, या साम्राज्याच्या काळात जवळजवळ संपूर्ण कर्नाटक , महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा काही भाग व कोकण आणि गोव्याचा समाविष्ट होता, राष्ट्रकूटांनी दोन शतकांहून अधिक काळ राज्य केले.

सामनगढ ताम्रपट अनुदान(इ.स. ७५३)पुष्टी करते की सरंजामशाही राजा दंतिदुर्गा , ज्याने बहुधा बेरार (महाराष्ट्रातील आधुनिक एलिचपूर किंवा अचलपुरा ) येथून राज्य केले होते ,त्याने बदामीच्या किर्तीवर्मन (दुसरा) याच्या सैन्याचा (बदामी चालुक्यांच्या सैन्याचा) पराभव केला आणि चालुक्य साम्राज्याच्या उत्तरेकडील प्रदेशांचा ताबा घेतला.

त्यानंतर त्याने आपला जावई पल्लव राजा नंदीवर्मन( दुसरा) याला चालुक्यांकडून कांची परत मिळविण्यात मदत केली आणि माळव्यातील गुर्जरांचा आणि कलिंग , कोसल आणि श्रीशैलमच्या राज्यकर्त्यांचा पराभव केला .

दंतिदुर्गाचा उत्तराधिकारी कृष्ण पहिला याने सध्याचे कर्नाटक आणि कोकणचा मोठा भाग आपल्या ताब्यात आणला. ध्रुव धारवर्षाच्या राजवटीत ज्याने इ.स.७८० मध्ये ताबा घेतला, राज्याचा विस्तार साम्राज्यात झाला व कावेरी नदी आणि मध्य भारतातील सर्व प्रदेश त्यांनी व्यापला .

ध्रुव धारवर्षाने कन्नौज येथे यशस्वी मोहिमांचे नेतृत्व केले व प्रसिद्धी आणि अफाट लूट मिळवून दिली. त्याने पूर्व चालुक्य आणि तलकडचे गंगाही आपल्या ताब्यात आणले. गोविंदा (तिसऱा) चा उत्तराधिकारी, अमोघवर्ष पहिला याने मन्यखेताला आपली राजधानी बनवली आणि मोठ्या साम्राज्यावर राज्य केले.

साम्राज्याच्या समाप्तीपर्यंत मन्यखेत ही राष्ट्रकूटांची शाही राजधानी राहिली. तो इ.स.८१४ मध्ये सिंहासनावर आला पण इ.स.८२१ पर्यंत त्याने सरंजामदार आणि मंत्री यांच्याकडून होणारे बंड दडपले नव्हते.

अमोघवर्षा प्रथम याने पश्चिम गंगा राजवंशाशी आपल्या दोन मुलींचे लग्न लावून शांती प्रस्थापित केली आणि नंतर विंगवल्ली येथे आक्रमण करणाऱ्या पूर्व चालुक्यांचा पराभव केला आणि वीरनारायण ही पदवी धारण केली.

पुर्वीच्या गोविंदा( तिसरा) सारखा हा राजा लढाऊ नव्हता कारण त्याने आपले शेजारी, गंगा, पूर्व चालुक्य आणि पल्लव यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यास प्राधान्य दिले ज्यांच्याशी त्याने वैवाहिक संबंध देखील जोपासले.

त्यांचा काळ कला, साहित्य आणि धर्मासाठी समृद्ध करणारा होता. राष्ट्रकूट सम्राटांपैकी सर्वात प्रसिद्ध म्हणून ओळखले जाणारे, अमोघवर्ष पहिला हे कन्नड आणि संस्कृत भाषेतील निपुण विद्वान होते.

कृष्ण (दुसरा) च्या राजवटीत , साम्राज्याला पूर्व चालुक्यांकडून बंडाचा सामना करावा लागला आणि कृष्ण (दुसरा) ने गुजरात शाखेचा स्वतंत्र दर्जा संपवला आणि मन्याखेताच्या थेट नियंत्रणाखाली आणले. इंद्र तिसऱ्याने परमाराचा पराभव करून मध्य भारतातील राजवंशाचे नशीब परत मिळवले आणि नंतर गंगा आणि जमुना नद्यांच्या प्रदेशावर आक्रमण केले .

वेंगीवर आपला प्रभाव कायम ठेवत त्याने राजवंशाचे पारंपारिक शत्रू, प्रतिहार आणि पाल यांचाही पराभव केला . सम्राट गोविंदा( चतुर्था) च्या इ.स. ९३० च्या ताम्रपटातील शिलालेखानुसार कन्नौजमधील त्याच्या विजयाचा प्रभाव अनेक वर्षे टिकला .

एकापाठोपाठ एक दुर्बल राजे ज्यांच्या कारकिर्दीत साम्राज्याने उत्तरेकडील आणि पूर्वेकडील प्रदेशांवर नियंत्रण गमावले, कृष्ण तिसरा शेवटचा महान शासक याने साम्राज्य मजबूत केले जेणेकरून ते नर्मदा नदीपासून कावेरी नदीपर्यंत पसरले आणि त्यात सामील झाले.

पश्चिम कोकणात इ.स. ७४० च्या सुमारास राष्ट्रकूट कुळातील दोन राजपुत्रांना आताच्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा प्रभारी म्हणून नियुक्त केले होते. राष्ट्रकूट गोविंदराजाला रत्नागिरीतील चिपळूण आणि इ.स. ७४२ च्या सुमारास चननापुरीवर राज्य करणाऱ्या राष्ट्रकूटांच्या राजघराण्याचा संस्थापक दंतिदुर्ग याच्याकडे सोपवण्यात आले होते.

चालुक्यांचे सम्राट विक्रमादित्यची मुलगी विनयावती हिच्यासोबत, राष्ट्रकूट राजकुमार गोविंदराजाची राणी बनली. इ.स ७५३ मध्ये, दंतिदुर्गाने चालुक्यांच्या युद्धात पराभूत केला. दंतिदुर्गाचा उत्तराधिकारी, कृष्ण याने चालुक्यांचे प्रतीक बदलून नवीन शक्ती दर्शविण्यासाठी सोनेरी गरुड हे प्रतीक आपल्या अंगरखावर कोरले असे म्हटले जाते तथापि, कोकण प्रदेश हा राष्ट्रकुटांचा सरंजामशाही प्रांत मानला जात असे आणि त्यावर दक्षिण गोवा शिलाहारांचे राज्य होते,

जे गोव्यातील किंवा दक्षिण कोकणातील होते आणि त्यांनी .इ.स ७५० ते १०२० पर्यंत गोव्यावर राज्य केले.स्वतःला सिंहलेश्वर , सिंहलाचा स्वामी व गोव्यातील आजच्या बाळळी किंवा वेळळी येथून राज्य केल्याचे नोंदवले जाते. त्यांनी मानवी रूपात दोन हात आणि पंख असलेला सोनेरी गरुड हे प्रतीक स्विकारले होते. तसेच देवी महालक्ष्मीची अनेक मंदिरे त्यांच्या काळात बांधली गेली.

गोवा शिलाहार शाखेची स्थापना शहानाफुलाने केली, खारेपट्टण ताम्रपट अनुदाना मध्ये म्हटल्याप्रमाणे, ज्याने राष्ट्रकूट सम्राट, कृष्णाने त्याच्यावर केलेला उपकार म्हणून दक्षिण कोकण मिळवले. वंशाचा शेवटचा ज्ञात शिलाहार राजा रत्तराज याने .इ.स १०२० पर्यंत राज्य केले.

शिलाहारांनी दिलेल्या अनुदानाच्या ताम्रपटा वरून असे ज्ञात होते की सह्याद्रीपासून पश्चिम किनारपट्टी पर्यंतचा प्रदेश शिलाहारांकडून सिंहलद्वीप आणि रेवती द्विप म्हणून ओळखला जात असे. चालुक्यांकडून .इ.स १०२४ मध्ये चालुक्य राजा जयसिंह( दुसरा) याने कोकणावर आक्रमण केल्यावर गोव्यातील शिलाहारांना चालुक्यांनी उखडून टाकले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

SCROLL FOR NEXT