Adilshahi administrator of the province of ponda Dainik Gomantak
ब्लॉग

अनवट इतिहास: फोंडा प्रांताचा आदिलशाही प्रशासक

फोंड्याचा सेनापती शरीफ मलिक हा आजही मिर्झान ते अंकोल्याच्या लोकांना एक नायक म्हणून स्मरणात राहिला आहे.

दैनिक गोमन्तक

सर्वेश बोरकर

फ्रान्सिस बुकानन-हॅमिल्टनने स्थानिक ग्राम लेखापाल रजिस्टरमधून सामग्री गोळा केली. केलाडीचा शासक व्यंकटप्पा नायक याने गेरुसोप्पा संस्थानावर हल्ला केला आणि गेरुसोप्पाच्या राणी चेन्नाभैरदेवीने विजापूरच्या आदिलशहाकडे मदत मागितली.

या घटनेच्या माहितीवरून, सुलतानाने कोकणातील आपल्या सर्व लष्करी अधिकाऱ्यांना (हवालदार) व फोंडा येथे राहणाऱ्या कोकणाच्या आदिलशाही सेनापतीला व्यंकटप्पाशी लढा देण्याचे आदेश दिले. मार्गशीर्ष शक १५२९च्या ५ तारखेला, त्यांनी चिंदवेरा (चंदावरा)पर्यंत प्रगती केली, जिथे व्यंकटप्पा नायक याचा पराभव झाला.

त्यांनी मिर्झान नदीच्या पलीकडे माघार घेतली आणि तेथे एक मजबूत किल्ला बांधल्यानंतर ही नदी, आदिलशहा व केलाडीचा शासक यांच्यातील सीमा बनली. पुढच्या वर्षी शरीफ आणि मुल्क फोंड्याला परतले. महसूल गोळा करण्यासाठी आणि फोंड्याला पाठवण्यासाठी मिर्झान येथे एका अधिकाऱ्याला (हवालदार) काम सोपवण्यात आले.

पस्तीस वर्षांच्या काळात बारा अधिकारी (हवालदार) होते. त्यांच्यानंतर महाल ‘मोकासी’ नावाचे अधिकारी आले, ज्यापैकी तीस वर्षांच्या कालावधीत मिर्झीन येथे दहा होते. त्यानंतर एका थान्नादाराने अठरा महिने राज्य केले. मिर्झान, अंकोला, फोंडे, कादवाड (कारवार) आणि शिवेश्वर असे पाच जिल्हे किंवा महाल, जे बहुधा राणी चेन्नाभैरदेवीच्या आधिपत्याचा भाग होते, आदिलशहाच्या वाट्याला आले आणि कारवार हे विजापूर राज्यातील एक प्रमुख बंदर बनले.

बुकाननने कथन केलेल्या घटनांना १८८३च्या कानारा गॅझेटियरमध्ये एका स्थानिक कथेसह दुजोरा दिला गेला आहे की, मुस्लिमांचे नेतृत्व एका सरपण मलिकने केले होते. एक नशीबवान बालक ज्याचे नाव सरपण मलिक पडले कारण तो एकदा जंगलात सर्प किंवा कोब्राच्या छत्राखाली झोपलेला आढळला होता.

कथेतील सर्प हे भविष्यातील महानतेचे आवडते चिन्ह विजापूरच्या सेनापतीला लागू केलेले दिसते. या कथेतील स्थानिक वृत्तांत पुढे असे सांगतात की, हा मुलगा आचावे गावातील हेब्बरची गुरे चरवण्याच्या कामाला होता. त्यांनी मुलाचे नाव सरपण मल्लिक ठेवले आणि सापाच्या घटनेनंतर त्याचे नशीब अजमावण्यासाठी त्याला राजधानीत पाठवले.

हाच मुलगा राजधानीत उच्च स्थान मिळवून घरी परतला आणि आचावेच्या आजूबाजूच्या पन्नास गावांचे नेतृत्व सरपण मल्लिककडून कृतज्ञता म्हणून हेब्बरला बक्षीस देऊन, हेब्बरला भेटायला आला. नवीन राज्यकर्त्यांकडून जप्तीच्या भीतीने कुटुंबाकडे असलेल्या मालमत्तेचे हित जपण्यासाठी या कथेची रचना करण्यात आली होती, यात शंका नाही. देशातील अनेक राज्यकर्त्यांच्या कथनांसारखीच हीसुद्धा एक कथा आहे.

१४९८मध्ये स्थापन झालेल्या आदिलशाही सल्तनतने निजामशाह आणि कुतुबशाह यांच्याशी १४९८च्या तहाने गोवा आणि दाभोळ ताब्यात घेतले आणि सल्तनतच्या या पश्चिम भागाचा कारभार पाहण्यासाठी गव्हर्नरची नियुक्ती करण्यात आली.

आदिलशाहीच्याबाबतीत पोर्तुगीज डॅनव्हर्सचे संदर्भ म्हणतात फोंड्याचा गव्हर्नर रोस्ती खान आहे, ज्याने ४०,००० माणसांसह संगमेश्वरच्या नाइकांविरुद्ध संयुक्त कारवाईसाठी साहाय्य केले होते, तर डॉम हिरोम डी मास्कारेन्हास यांनी १५८४मध्ये समुद्रमार्गे हल्ला केला होता.

शरीफ यांचा आणखी एक संदर्भ ’भारतातील पोर्तुगीज, बीइंग अ हिस्ट्री ऑफ द राइज अँड डिलाईन ऑफ देअर ईस्टर्न एम्पायर’ (फ्रेडरिक चार्ल्स डॅनव्हर्स)मध्ये आढळतो. फोंड्याचा सेनापती शरीफ मलिक पोर्तुगिजांना त्रास देत होता.

व्हाइसरॉय डोम हिरोमला शंका होती की आदिलशाह मलिकला पाठिंबा देत आहे. म्हणून त्याने अँटोनियोला विजापूरला रवाना केले की फोंड्याच्या मलिकचे कारनामे तपासावे आणि विजापूर येथे कारखाना स्थापन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या डचांना हाकलून द्यावे. आदिलशहा यांनी या मागण्या मान्य केल्या.

या हेतूने १६१४ मध्ये पोर्तुगिजांनी विजापूरच्या एका आवडत्या दरबारीला विजापूर येथे राहणाऱ्या आणि विजापुरी सरदारांशी जवळचा संबंध असलेल्या व्हिन्सेंट रिबेरो याच्यामार्फत लाच दिली

व्हॉइसरॉयला आता गंभीरपणे बाबींवर लक्ष देणे आणि पोर्तुगिजांच्या भारतातील स्थानाचा विचार करणे, मोगल आणि फोंड्याचा सेनापती शरीफ मलिक यांच्या एकाचवेळी विरोधाला सामोरे जाणे बंधनकारक होते; आदिल खान खरोखरच मलिकला पाठिंबा देत असल्याचा संशय घेण्यास त्याच्याकडे चांगली कारणे होती.

त्यामुळे डॉम हिरोमन अँटोनियो मॉन्टेरो कॉर्टे रिअलला राजदूत म्हणून आदिल खानला भेटवस्तू देऊन पाठवले. त्यामुळे अँटोनियो मोंटेरो विजापूरला गेला आणि त्याने आदिल खानकडे मागणी केली की मलिकला फोंडा येथे कैद करावे; आणि डच, जे विजापूर येथे कारखाना स्थापन करण्याचा प्रयत्न करीत होते, त्यांना हाकलून द्यावे. व्हिन्सेन्टे रेबेरो या पोर्तुगिजांच्या मदतीमुळे, जो तेथे राहत होता, या दोन्ही मागण्या मान्य करण्यात आल्या.

फोंड्यामध्ये आता नवीन सेनापती म्हणून मिर्झा मोहम्मद अमीन यांची नियुक्ती केली गेली व नंतर ‘मुस्तफा खान’ ही पदवी त्यांना बहाल केली गेली, फोंड्याचा सेनापती शरीफ मलिक हा आजही मिर्झान ते अंकोल्याच्या लोकांना एक नायक म्हणून स्मरणात राहिला आहे , जो हा भाग विजापूरच्या आधिपत्याखाली आणायला कारणीभूत ठरला व त्याच्याकडून १६०८-१६१० मध्ये मिरजन आणि अंकोला पर्यंतचे किल्ले पुन्हा बांधले गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT