Farmer Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: PM किसान योजनेत मोठे बदल ! जाणून घ्या, नाहीतर पैसे मिळणार नाहीत

PM Kisan Latest Updates: 12 व्या हप्त्याचे 2 हजार रुपयेही शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ लागले आहेत.

दैनिक गोमन्तक

PM Kisan Samman Nidhi Updates: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मोदी सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 12 हप्ते पाठवले आहेत. 12 व्या हप्त्याचे 2 हजार रुपयेही शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ लागले आहेत. आता शेतकरी 13 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. परंतु आतापर्यंत या योजनेत (PM Kisan Samman Nidhi) अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. जाणून घ्या...

1. धारण मर्यादेची समाप्ती

पीएम किसान (PM Kisan) योजनेच्या सुरुवातीला फक्त तेच शेतकरी पात्र मानले जात होते, ज्यांच्याकडे 2 हेक्टर किंवा 5 एकर शेती होती. पण आता 14.5 कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी मोदी सरकारने ही सक्ती दूर केली आहे.

2. आधार कार्ड आवश्यक

ज्या शेतकऱ्यांकडे आधार आहे, त्यांनाच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळेल. आधारशिवाय तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. सरकारने लाभार्थ्यांना आधार कार्ड अनिवार्य केले आहे.

3. नोंदणी सुविधा

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना (Farmers) या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मोदी सरकारने कृषी अधिकाऱ्यांच्या फेऱ्या मारण्याची सक्ती दूर केली आहे. आता शेतकरी घरबसल्या सहज नोंदणी करु शकतात. जर तुमच्याकडे खतौनी, आधार कार्ड (Aadhar Card), मोबाईल नंबर आणि बँक खाते क्रमांक असेल तर तुम्ही pmkisan.nic.in वर फार्मर्स कॉर्नरवर जाऊन स्वतःची नोंदणी करु शकता. तसेच काही चूक झाली असेल तर ती तुम्ही स्वतः दुरुस्त करु शकता.

4. तुमचे स्टेटस जाणून घ्या

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सरकारने सर्वात मोठा बदल केला की, नोंदणी केल्यानंतर तुम्ही तुमचे स्टेटस स्वतः तपासू शकता. त्याचबरोबर, तुम्ही आता तुमच्या स्वतःच्या अर्जाचे स्टेटस तपासू शकता, तुमच्या बँक खात्यात किती हप्ता आला आहे. कोणताही शेतकरी पीएम किसान पोर्टलला भेट देऊन त्याच्या स्टेटसबद्दल माहिती मिळवू शकतो.

5. किसान क्रेडिट कार्ड

आता या योजनेअंतर्गत किसान क्रेडिट कार्ड (KCC) देखील जोडण्यात आले आहे. पीएम किसानचे लाभार्थी सहजपणे KCC बनवू शकतात. शेतकऱ्यांना KCC वर 4 टक्के दराने 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्जही मिळते.

6. मानधन योजनेचे फायदे

पीएम-किसान सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे पीएम किसान मानधन योजनेसाठी कोणतीही कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत. या योजनेंतर्गत, शेतकरी पीएम-किसान योजनेतून मिळणाऱ्या लाभांमधून थेट योगदान देऊ शकतात. पीएम किसान योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करत आहे.

7. राशन कार्ड अनिवार्य

आता किसान योजनेंतर्गत लाभार्थ्यांकडे शिधापत्रिका असणे बंधनकारक झाले आहे. म्हणजेच, आता फक्त अशा शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे, जे त्यांच्या अर्जात शिधापत्रिकेचा तपशील अपडेट करतील.

8. KYC अनिवार्य केले

आता पीएम किसान योजनेंतर्गत केवायसी करणे अनिवार्य झाले आहे. तुम्‍ही अद्याप केवायसी केले नसेल, तर ते तात्काळ करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mathura Boat Accident: वृंदावनमध्ये काळजाचा थरकाप! यमुनेत 27 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, 10 जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

VIDEO: सलमान खानचा चढला पारा! चाहत्याच्या 'त्या' कृतीवर भडकला भाईजान; नेटकरी म्हणाले, ''तो तुझा बालपणीचा मित्र आहे का''?

Mumbai Gold Smuggling Bust: मुंबई विमानतळावर 38 कोटींचं सोनं जप्त! डीआरआयकडून आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; 26 जणांना ठोकल्या बेड्या

Horoscope April 2026: ग्रहांचा राजा बदलणार तुमचं भविष्य! बँक बॅलन्स वाढणार, नशीब चमकणार; 'या' राशीच्या लोकांची चांदीच चांदी

Mojtaba Khamenei: 'शहीदांच्या रक्ताचा बदला घेणार!' युद्धविरामानंतर खामेनेईंची गर्जना; शत्रूला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचं ठणकावलं

SCROLL FOR NEXT