Svadeshi Mills Mumbai Twitter
अर्थविश्व

नागपूरच्या कामगारांना मुंबईत आणून जमशेदजींनी केला होता 'स्वदेशी मिल' चमत्कार

कपड्यांच्या व्यवसायाच्या यशानंतर जमशेदजी टाटा यांनी 1886 मध्ये आणखी एक मोठे काम हाती घेतले.

दैनिक गोमन्तक

टाटा समूहाचे (Tata Group) संस्थापक जमशेदजी टाटा (Jamsetji Tata) यांचा जन्म 3 मार्च 1839 रोजी झाला होता. पण जमशेदजी टाटा 47 वर्षांचे असताना त्यांनी असा चमत्कार घडवून आणला होता ज्याची टाटा समूहाने वारंवार पुनरावृत्ती केली आणि आता पुन्हा एकदा अशाच चमत्काराची आशा संपूर्ण देशाने टाटांकडे व्यक्त केली आहे. (Svadeshi Mills Mumbai)

जमशेदजींची 'स्वदेशी मिल'

जमशेदजी टाटा यांनी मुंबईत ताज हॉटेल आणि टाटा स्टीलच्या स्थापनेपूर्वीही कपड्यांचा व्यवसाय केला होता. त्यांनी 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीने 1874 मध्ये नागपूर, महाराष्ट्र येथे सेंट्रल इंडिया स्पिनिंग, विव्हिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सुरू केली होती. पुढे ही गिरणी एम्प्रेस मिल झाली. कपड्यांच्या व्यवसायाच्या यशानंतर जमशेदजी टाटा यांनी 1886 मध्ये आणखी एक मोठे काम हाती घेतले.

मुंबईतील कुर्ला येथे बांधलेल्या धरमसी मिलचे वैभव परत आणण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. ही कंपनी चार वर्षांपासून तोट्यात होती. पण त्यांना या गिरणीत गुंतवणूक करणे योग्य वाटले कारण ती त्याच्या मूळ किमतीच्या एक षष्ठांश दराने उपलब्ध होती आणि ती फ्री-होल्ड जमिनीवर बांधली गेली होती. त्यांनी त्याचे नाव बदलून 'स्वदेशी मिल' असे ठेवले, पण ती विकत घेणे त्यांना खूप अवघड झाले होते.

प्रत्यक्षात कामगारांची कमतरता, जुनी आणि सदोष यंत्रसामग्री आणि या मिलच्या उत्पादनांबाबत सततच्या तक्रारी यामुळे टाटांचे नाव पणाला लागले होते. दोन वर्षानंतर, ही मिल भागधारकांना लाभांश देण्यास अयशस्वी ठरली आणि तिच्या शेअरची किंमत एक चतुर्थांश झाली. पण जमशेदजी टाटांनी हार मानली नाही आणि ती वाचवण्यासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावले, अगदी स्वतःचे वैयक्तिक आयुष्याचाही त्यांनी विचार केला नाही. त्यांनी 'स्वदेशी मिल्स' (Svadeshi Mills) मध्ये अधिक भांडवल टाकले, एम्प्रेस मिलचे (Empress Mill) काही शेअर्स विकले, नवीन इंजिन, बॉयलर, नवीन शेड बांधले. याशिवाय त्यांनी त्यांच्या नागपूर गिरणीतून अनुभवी कामगारांना परत आणले आणि ही देशी गिरणी वस्त्रोद्योगात चमकणारा एक तारा बनली.

वारंवार दाखवला चमत्कार

टाटा समूहाने हा चमत्कार पुन्हा पुन्हा दाखवला आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे काम कंपनीचे विद्यमान अध्यक्ष रतन टाटा यांच्या कार्यकाळाशी संबंधित आहे. त्यांनी जग्वार आणि लँड रोव्हरसारख्या (Jaguar Land Rover) कार ब्रँडला तोट्यातून बाहेर काढले. एवढेच नाही तर ब्रिटनच्या दीर्घकाळ तोट्यात चाललेल्या कंपनीच्या कोरस स्टीलचेही अधिग्रहण केले.

आता देशाचा टाटांवर विश्वास आहे

अलीकडेच टाटा समूहाने एअर इंडियाचे (Air India) अधिग्रहण केले आहे. एअर इंडियाही दीर्घकाळापासून तोट्यात आहे आणि टाटा या कंपनीचे दिवस पुन्हा बदलतील असा विश्वास देशाला आहे. एअर इंडियाची सुरुवात टाटा समूहाच्या जेआरडी टाटा यांनी 1932 मध्ये केली होती. टाटांच्या या वारशामुळे आज देशातील सर्वात विश्वासार्ह व्यावसायिक समूह म्हणून ओळखली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'झुरळ' शब्दाने भडकवला बेरोजगारांचा वणवा! 'कॉक्रोच जनता पार्टी'ने हादरवली दिल्ली

फेब्रुवारीतील इशारा ऐकला असता तर... सरकारवर नामुष्कीची आणि लाखो मुलांच्या जीव टांगणीला लागण्याची वेळ आली नसती; CBSE चा 'महा'घोटाळा चव्हाट्यावर!

Goa ST Reservation: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाचे डोळे दिल्लीकडे, गोव्यात आरक्षणाचा सर्वात मोठा सस्पेन्स; अमित शहा आठवडाभरात भूमिका करणार स्पष्ट?

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

SCROLL FOR NEXT