Inflation on the eve of Diwali! Onion 80 rupees per kg, price of tomato also hikes: 
अर्थविश्व

Onion Price Hike: दिवाळीच्या तोंडावर महागाईचा भडका! कांदा 80 रुपये किलो, टोमॅटोही झाला 'लाल'

Tomato Price Hike: ग्राहक व्यवहार विभागाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, 26 ऑक्टोबरपर्यंत कांद्याची सरासरी घाऊक किंमत 3,112.6 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचली आहे, जी 1 ऑक्टोबरच्या 2,506.62 रुपये प्रति क्विंटलपेक्षा खूप जास्त आहे.

Ashutosh Masgaunde

Inflation on the eve of Diwali! Onion 80 rupees per kg, price of tomato also hikes:

नवरात्र महोत्सव संपल्यानंतर देशात कांद्याचे भाव झपाट्याने वाढत आहेत. दिल्लीतील गाझीपूर मंडईत घाऊक दराने कांद्याचे भाव वाढतच चालले आहेत.

गाझीपूर भाजी मंडईतील एका कांदा व्यापाऱ्याने सांगितले की, कांद्याची आवक कमी असल्याने भाव वाढत आहेत. बाजारात कांद्याचा घाऊक भाव 70 रुपये किलो आहे. शनिवारी सकाळी कांद्याचा दर ३५० रुपये (प्रति ५ किलो) असल्याचे व्यापाऱ्याने सांगितले.

शुक्रवारी ते 300 रुपये होते. त्यापूर्वी ते 200 रुपये होते. आठवडाभरापूर्वी 200 रुपये, 160 रुपये किंवा 250 रुपये असे दर होते. गेल्या आठवड्यापासून दरात सातत्याने वाढ होत आहे.

...तर कांदा, टोमॅटो आणखी महागणार

गाझीपूर मंडईतील एका भाजी विक्रेत्याने सांगितले की, आम्ही येथे कांदा खरेदी करण्यासाठी आलो आहोत.नवरात्रीपूर्वी कांद्याचे दर ५० रुपये होते, आता ७० रुपये किलो आहेत. आमची खरेदी 70 रुपये प्रति किलो आहे. आम्ही ते किरकोळ बाजारात 80 रुपये किलो दराने विकू.

पूर्वी कांद्याचे दर ३०-४० रुपये किलो होते. असेच सुरू राहिल्यास कांद्याचे भाव १०० रुपये किलोपर्यंत पोहोचतील.

यावेळी कांद्याच्या भावाबरोबर टोमॅटोचे दरही वाढले आहेत. पूर्वी टोमॅटोचा भाव 20 रुपये किलो होता, आता तो 40 ते 45 रुपये किलो झाले आहे, असेच सुरू राहिल्यास टोमॅटोही 70 रुपये किलोपर्यंत पोहोचेल.

महाराष्ट्राची भूमिका

कांद्याचे भाव वाढण्यामागील एक कारण म्हणजे त्याचा उत्पादनावर होणारा परिणाम. खराब हवामानाचा कांदा लागवडीवर परिणाम झाला आहे.

कांद्याचे उत्पादन 14,82,000 मेट्रिक टनांनी घटले आहे, जे 2022-23 मध्ये 17,41,000 हेक्टर होते. तर 2021-22 मध्ये ते 19,41,000 हेक्टर होते. म्हणजे वर्षानुवर्षे कांद्याचे उत्पादन कमी होत आहे.

एवढेच नाही तर कांद्याचे भाव वाढण्यामागे उत्पादनास होणारा विलंब हे एक प्रमुख कारण आहे. कांद्याचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात होते.

महाराष्ट्रात खरीप हंगामातील कांद्याचे उत्पादन एक महिना उशिराने झाले. मान्सूनच्या पावसाला झालेल्या विलंबामुळे खरीप हंगामातील कांदा बाजारात पोहोचला नाही. या विलंबामुळे कांद्याच्या भावात वाढ झाली आहे.

सरकारचे प्रयत्न अपुरे

भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, बाजारात कांद्याचा तुटवडा असून, त्याचा परिणाम भावावर होत आहे. पुढील महिन्यात नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत नवीन माल बाजारात येईल. नवीन माल येईपर्यंत कांद्याचे भाव उतरण्याची अपेक्षा नाही.

कांद्याची आवक कमी असल्याने त्याचा भाव वाढत आहे. आठवडाभरापूर्वी 20 ते 30 रुपये किलोने विकला जाणारा कांदा अचानक 80 रुपयांच्या पुढे गेला आहे. सरकारचे प्रयत्न करूनही कांद्याचे भाव आटोक्यात येत नसल्याची परिस्थिती आहे.

दिवाळीपूर्वी कांद्याच्या वाढत्या भावाचा परिणाम लोकांच्या घरच्या बजेटवर होऊ लागला आहे. मात्र, विधानसभा निवडणुका लक्षात घेता सरकार कांद्याच्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस पावले उचलेल, अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT