Epfo Dainik Gomantak
अर्थविश्व

EPFO : कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाची मोठी माहिती; जाणून घ्या

सेवानिवृत्तीच्या वयाच्या संदर्भात सध्या अनेक प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) खाजगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

दैनिक गोमन्तक

सेवानिवृत्तीच्या वयाच्या संदर्भात सध्या अनेक प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) खाजगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या वयामुळे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा विचार EPFO ​​करत आहे.

पेन्शन प्रणालीचा भार कमी होईल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, EPFO ​​ने म्हटले आहे की, निवृत्तीचे वय वाढवल्याने पेन्शन प्रणालीवरील भार लक्षणीय प्रमाणात कमी होईल. याचा लाभ सरकारी आणि कर्मचारी दोघांनाही मिळणार आहे. त्यामुळेच सरकार हा विचार करत आहे.

2047 पर्यंत किती लोक निवृत्त होतील

संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 2047 पर्यंत भारतात 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची संख्या 140 दशलक्षांपेक्षा जास्त असेल, ज्यामुळे पेन्शन फंडावरील दबाव लक्षणीय वाढेल. याशिवाय, इतर देशांमध्ये ते 67 वर्षांपर्यंत आहे.

कर्मचाऱ्यांकडून अधिक रक्कम जमा केली जाईल

माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, जर निवृत्तीचे वय वाढले तर त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पेन्शन फंडात जास्त पैसे जमा होतील आणि कर्मचाऱ्यांना अधिक फायदे मिळतील.

आता निवृत्तीचे वय किती आहे?

भारतात निवृत्तीचे कमाल वय 58 ते 65 वर्षे आहे. यामध्ये सर्व प्रकारचे खाजगी व सरकारी कर्मचारी येतात. याशिवाय, जर आपण युरोपियन युनियनबद्दल बोललो, तर तेथे निवृत्तीचे सरासरी वय 65 वर्षे आहे. सध्या युरोपातील डेन्मार्क, इटली आणि ग्रीसमध्ये निवृत्तीचे वय 67 वर्षे आहे, तर अमेरिकेत 66 वर्षे निश्चित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT