PM Kisan Scheme Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan च्या 13 व्या हप्त्यापूर्वी आली आनंदाची बातमी, सरकार करणार हा मोठा बदल!

PMFBY: सरकार प्रधानमंत्री फसल विमा योजनेत (PMFBY) बदल करणार आहे. हा बदल शेतकऱ्यांच्या हिताचा असेल.

दैनिक गोमन्तक

Pradhan Mantri Fasal Bima Yojana: अलीकडेच पंजाब सरकारकडून 'प्रधानमंत्री फसल विमा योजने' (PMFBY) ला मंजुरी मिळाल्यानंतर आता केंद्र सरकारच्या या योजनेवर आणखी एक मोठी अपडेट आली आहे. कृषी सचिव मनोज आहुजा म्हणाले की, 'हवामानाचे संकट आणि तंत्रज्ञानातील झपाट्याने होणारे बदल लक्षात घेऊन सरकार प्रधानमंत्री फसल विमा योजनेत (PMFBY) बदल करणार आहे. हा बदल शेतकऱ्यांच्या हिताचा असेल.'

हवामानाच्या आपत्तींचा थेट परिणाम शेतीवर होतो

2022 मध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाबमध्ये (Punjab) जास्त पाऊस झाला आहे. तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये कमी पाऊस झाल्याने भात, कडधान्ये आणि तेलबिया या पिकांचे नुकसान झाले आहे. अलीकडे हवामानातील अनिश्चिततेच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. दुसरीकडे, आहुजा यांनी निवेदनात म्हटले की, 'अशा हवामान आपत्तींचा थेट परिणाम शेतीवर होत असल्याने, देशातील असुरक्षित शेतकरी समुदायाचे निसर्गाच्या तडाख्यापासून संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.'

दुसरीकडे, या परिस्थितीत पीक विम्याची मागणी वाढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतातील शेतकऱ्यांना पुरेसे विमा संरक्षण देण्यासाठी पीक, ग्रामीण आणि इतर प्रकारच्या कृषी विमा उत्पादनांवर अधिक भर देणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले की, "केंद्रीय कृषी आणि शेतकरी (Farmer) कल्याण मंत्रालय अलीकडील हवामान संकट आणि वेगवान तांत्रिक विकासाला प्रतिसाद म्हणून PMFBY मध्ये शेतकरी समर्थक बदल करण्यासाठी सज्ज आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

तुमचे फोटो बनवा भन्नाट! विंटेज AI, Nano Banana ट्रेंड फॉलो करायचाय? येथे आहेत सर्व Prompt

Amarashilpi Jakanachari History: आश्चर्यकारक छिद्रातून सूर्यप्रकाश येतो, तो थेट मूर्तीवर पडतो; कैडलचा अमरशिल्पी जकनाचारी

Maratha History: छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयामुळे, ‘मराठा’ उपाधीला प्रतिष्ठा प्राप्त झाल्यावर गोव्यात बदल घडला

India vs Pakistan: ''टीम इंडियाला हलक्यात घेऊ नका, ते सहज हरवू शकतात", शोएब अख्तर घाबरला, पाकिस्तानला दिला 'हा' इशारा

Goa Crime: "कुत्र्यांना मारू नका" म्हटल्याने कॉन्स्टेबलची तरुणाला मारहाण, गुन्हा दाखल करण्यात पोलिसांची टाळाटाळ?

SCROLL FOR NEXT