EV Charging Care Dainik Gomantak
अर्थविश्व

EV Charging Care: ईलेक्ट्रिक वाहन चार्ज करताना घ्या 'ही' काळजी अन्यथा होईल मोठे नुकसान

इलेक्ट्रिक वाहन चार्ज करतांना काळजी घेणे गरजेचे आहे.

दैनिक गोमन्तक

EV Charging Care: जर तुम्ही ईलेक्ट्रिक वाहन वापरत असाल तर तर तुम्हाला थोडे सावध राहण्याची गरज आहे. इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्याचे काही मार्ग आहेत.

अनेक लोक नकळत अशा अनेक चुका करतात ज्यामुळे त्यांची ईलेक्ट्रिक वाहनची बॅटरी कमी रेंज देते किंवा बॅटरीशी संबंधित समस्या समोर येऊ लागतात. यामुळे कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेउया.

उन्हात चार्जिंग करणे टाळावे

इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगसाठी उन्हात ठेउ नये. कारण इलेक्ट्रिक वाहन लिथियम आयन बॅटरीसह येते, जी जास्तीत जास्त दाबासाठी सर्वोत्तम मानली जात नाही.

यामुळे वाहन जास्त तापू शकते आणि बॅटरीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच जेव्हा तुम्ही तुमची इलेक्ट्रिक कार चार्जिंगला लावाल तेव्हा त्याकडे लक्ष द्या.

बॅटरी डिस्चार्ज होउ नका देउ

जर तुम्हाला चांगली रेंज हवी असेल तर तुम्हाला बॅटरीची थोडी जास्त काळजी घ्यावी लागेल. EV बॅटरींना कधीही पूर्णपणे डिस्चार्ज होऊ देऊ नये, कारण जेव्हा तुम्ही चार्ज करण्यासाठी पूर्ण डिस्चार्ज केलेली बॅटरी ठेवता तेव्हा सुरुवातीची विद्युत ऊर्जा जास्त वापरली जाते.

यामुळे तुमच्या इलेक्ट्रिक चार्जिंगच्या खर्चात मोठा फरक पडतो. म्हणूनच असा सल्ला दिला जातो की जर तुमची बॅटरी 10 ते 15 टक्के कमी झाली असेल तर तुम्ही ती पूर्णपणे चार्ज करू शकता.

जास्त चार्ज करु नका

बॅटरी कधीही जास्त चार्ज करू नका. हे स्मार्टफोनच्या बॅटरीसारखेच आहे. EV बॅटरी चार्ज करताना, ती 100 टक्के करणे टाळा.

बहुतेक EV मध्ये आढळणाऱ्या लिथियम-आयन बॅटरी 30-80 टक्के चार्ज रेंजमध्ये सर्वोत्तम कार्य करतात. पूर्ण क्षमतेने बॅटरी सतत चार्ज केल्याने बॅटरीवर ताण येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: बोरी पूल वाहतुकीस दोन दिवस राहणार बंद

'IFFI 2025'त 'ही मॅन' धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहताना आमिर खान भावुक! जुन्या आठवणींना दिला उजाळा

Bicholim: ..आणखी कितीजणांचे 'बळी' जाण्याची वाट पाहणार? व्हाळशीतील अपघात टाळण्यासाठी मागणी; जंक्शन ठरतेय मृत्यूचा सापळा

Valpoi: 'रस्ता, गटार किमान 5 वर्षे टिकावेत'! वाळपईवासीयांचे मत, भूमिगत केबल्सची कायम स्वरुपी व्यवस्थेची मागणी

IFFI 2025: 'पर्रीकरांनी हा महोत्सव गोव्यात आणला ही मोठी भाग्याची गोष्ट', तामिळनाडू भाजपचे उपाध्यक्ष के. अण्णामलाई यांचे गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT