Budget 2023 Dainik Gomantak
अर्थविश्व

Budget 2023: अर्थमंत्र्यांची रेल्वेसाठी मोठी घोषणा,2013 च्या तुलनेत केली 9 पटींनी वाढ

Budget 2023: पायाभूत सुविधांसाठी निधी , शेतकऱ्यांसाठी निधीची तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे. यासोबतच रेल्वेसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. 2023-24च्या अर्थसंकल्पात 2013 च्या 9 पट वाढ झाल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Budget 2023: भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत आज अर्थसंकल्प प्रस्तुत केले. यामध्ये इनकम टॅक्स मध्ये मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे. आयकराची रचना बदलण्यात आली आहे.

पायाभूत सुविधांसाठी निधी , शेतकऱ्यांसाठी निधीची तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे. यासोबतच रेल्वेसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. 2023-24च्या अर्थसंकल्पात 2013 च्या 9 पट वाढ झाल्याचे म्हटले आहे.

2 लाख 40 हजार कोटी निधीची रेल्वेसाठी तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे( Railway)मध्ये डिजिटल तिकिट प्रणालीचा अवलंब करण्यावर भर देणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटले आहे.

याबरोबरच, रेल्वेमध्ये 100 नवीन योजना करणारअसल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. या नवीन योजनांसाठी 75 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. या योजना राबविण्यासाठी खाजगी क्षेत्राची मदत घेतल्याचे म्हटले आहे.

रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी तरतूदी करण्यासोबतच रेल्वेच्या नवीन मार्ग आणि नव्या प्रकल्पांना गती देणार असल्याचेदेखील अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आपल्या अर्थसंल्पीय भाषणात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पालकांनो, मुलांच्या हाती फोन देताय? त्याआधी ऑन करा 'या' 5 सेटिंग्ज, अश्लील कंटेंटला बसेल कायमचा लगाम

VIDEO: 'मला वाटलं होतं खूप घाण असेल, पण...' भारतीय रेल्वेच्या प्रवासाने विदेशी तरुणी भारावली; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IPL 2025: RCB फॅन्ससाठी मोठी बातमी! चिन्नास्वामी स्टेडियमवर सामने होणार की नाही? कर्नाटक सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

Goan Solkadhi: गोंयकाराची पहाटेची स्वप्नं दाट गुलाबी असतात, कारण त्यात 'सोलकढी'तल्या सोलाचा गडद रंग आणि नारळाच्या रसातला दाटपणा असतो..

तेंव्हा इकडे स्वतंत्र भारत, तर तिकडे गोवा होता! याबाजूला भारतीय जवान तर तिकडे पाकल्यांचे ‘सोजीर’ बंदुका घेऊन ताठ उभे होते..

SCROLL FOR NEXT