वाळपई येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा जमिनीचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या साधनसुविधांच्या कामांना अडथळा निर्माण झाला आहे. केंद्र सरकारच्या 'पीएम श्री स्कूल' योजनेंतर्गत या विद्यालयासाठी खासदार निधीतून सुमारे साडेचार कोटी रुपये मंजूर झाले असले, तरी न्यायालयाच्या आदेशाशिवाय या निधीचा वापर करता येत नसल्याने ही कामे रखडली आहेत.
यात मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीसह इतर महत्त्वाची कामेही प्रलंबित आहेत. अलीकडेच झालेल्या पालक-शिक्षक संघाच्या बैठकीत पालकांनी या समस्येवर चिंता व्यक्त केली असून, 'डबल इंजिन' सरकारने तातडीने हस्तक्षेप करून हा वाद मिटवावा, जेणेकरून विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित होईल, अशी मागणी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.