पणजी: सरकारने कला अकादमी वास्तूच्या नूतनीकरणावर खर्च केलेले ६० कोटी रुपये पाण्यात गेल्यात जमा झाले आहेत. याप्रकरणी सरकारने नेमलेल्या कृती दल समितीच्या अहवालात बोट ठेवलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी आणखीन २५ कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.
हा अहवाल आज समितीचे अध्यक्ष विजय केंकरे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर केला. त्रुटी दूर करण्यासाठीचा हा खर्च कंत्राटदारांकडून वसूल करण्याची मुख्यमंत्र्यांनी तयारी दर्शवली असली तरी मूळ खर्च वाया गेल्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, हा प्रश्न आहे. त्याहीपुढे समितीने दाखवलेल्या त्रुटी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी मान्य करणार का, की कला अकादमीची त्रुटीपूर्ण वास्तू रसिकांच्या माथी मारणार, हाही प्रश्न ठळकपणे पुढे आला आहे.
याशिवाय खुल्या नाट्यगृहाच्या कोसळलेल्या वास्तूच्या पुनर्बांधणीसाठीही सरकारला अंदाजे ४० कोटी रुपये खर्च करावे लागू शकतात. त्यामुळे या गलथान कारभाराची जबाबदारी सरकार कोणावर निश्चित करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.