Goa News: राज्यातील लोक कर्जबाजारी ; गांधींचे विचार आत्मसात करा - युरी आलेमाव

Yuri Alemao: पणजीतील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात सोमवारी महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
yuri alemao
yuri alemaoDainik Gomantak
Published on
Updated on

Yuri Alemao Goa News: पणजी : राज्यात बेरोजगारी वाढलेली आहे. दुसऱ्या बाजूला राज्य आर्थिक संकटाकडे झुकत चालले आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर २ लाख रुपये कर्जाचा बोजा असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी महात्मा गांधी यांचे विचार आत्मसात करण्याची गरज व्यक्त केली.

पणजीतील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात सोमवारी महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, खासदार फ्रान्सिस सार्दिन, आमदार एल्टन डिकॉस्ता, आमदार कार्लुस फेरेरा, ज्येष्ठ नेते शंभुभाऊ बांदेकर, एदुआर्द फालेरो, महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा बीना नाईक, प्रदेश युवक काँग्रेसचे सदस्य तसेेच इतर मान्यवर उपस्थित होते.

गोवा यापूर्वी श्रीमंत होता. लोकांकडे पैसे नसले तरी खाण्यासाठी पोटभर मिळत होते. आता राज्यात उलट स्थिती पाहायला मिळत आहे आणि ते महात्मा गांधींच्या तत्त्वांच्या विरोधात आहे.

गांधीजी गरिबांचे मसिहा होते; पण आज राज्यातील नेते श्रीमंतांचे मसिहा असल्याची टीका आलेमाव यांनी केली.

महात्मा गांधी नेहमी सांगत समाजापुढे गरिबीची मोठी समस्या आहे आणि ती हटविणे आवश्‍यक आहे. त्यांच्या विचारांमुळेच काँग्रेसने देशात गरिबी हटविण्याचा नारा दिला. राज्य आर्थिक संकटात खेचले जात आहे.

राज्य सरकार कोणतीही पर्वा न करता कर्ज काढत आहे आणि येथील जनतेवर कर्जाचा बोजा टाकत आहे. दोन-तीन नेते गोव्यातील सरकारला दिशा दाखवत आहे आणि हे चुकीचे आहे.

- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com