
पणजी: राज्यात सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाणे देण्यावर बंदी घालावी, अशी मागणी फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत केली. शून्य तासाला त्यांनी शेजारील महाराष्ट्रात ५६ ठिकाणच्या कबुतरखान्यांवर बंदी घातल्याची माहिती दिली.
सरदेसाई म्हणाले, गोव्यात विशेषतः शहरांत कबुतरांची संख्या कमालीची वाढली आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्र सरकारने ५६ ठिकाणच्या कबुतरखान्यांवर कायद्याने बंदी घातली आहे.
गोव्यात गुंतवणूक करण्यासाठी सरकार निमंत्रित करत असलेल्या समाजाला कबुतरांना दाणे देण्याची सवय आहे. कबुतरांमुळे श्वसनाचे आजार होतात. यामुळे सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाणे देण्यावर बंदी घालावी.
विधानसभा संकुलावरही भरपूर कबुतरे आहेत. ती वातानुकूलन यंत्रणेवर बसत असतील. त्यातून रोग आमच्यापर्यंत पोहोचू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.