Valpoi News : अडवईत नैसर्गिक पद्धतीने भाजी लागवड; सयाजी देसाई यांची स्वयंरोजगाराकडे वाटचाल

आपली पारंपरिक वडिलोपार्जित शेतीची जपणूक करून नैसर्गिक पध्दतीने शेती करणाऱ्यावर भर देत आहेत.
agriculture
agricultureDainik Gomantak

Valpoi : सत्तरी हा कृषिप्रधान तालुका आहे. त्यामुळे अनेकजण आपली पारंपरिक शेतीची जपणूक करून त्यांचा वसा पुढे नेताना दिसत आहेत. आज अनेकजण नोकरी करत असले तरी आपले काम सांभाळून कृषी क्षेत्राचे विविध पीक घेऊन आपण शेतकरी आहोत याचा त्यांना अभिमान आहे. आपली पारंपरिक वडिलोपार्जित शेतीची जपणूक करून नैसर्गिक पध्दतीने शेती करणाऱ्यावर भर देत आहेत.

अडवई सत्तरी येथील सयाजी देसाई आपल्या शेतात विविध ऋतूंनुसार वेगवेगळ्या अशा मिश्र पिकांची लागवड करीत आहेत. आता पावसाळा सुरू झाल्याने पावसाळी भाज्यांची लागवड त्यांनी केलेली आहे. त्यात भेंडी, हळद, पावसाळी कंदमुळे त्यात अळू, काटेकणगा, रताळी, करांडे तसेच इतर भाज्यांची लागवड केलेली आहे.

एकूण एक हजार चौ.मी. जमिनीत त्यांनी भेंडीची लागवड केलेली आहे आणि त्याला दोन दिवसाआड ३० किलोच्यावर उत्पादन मिळत आहे. तसेच भेंडीचे बियाणे बेळगाव येथून आणले आहे. ही सर्व शेती त्यांनी नैसर्गिक पध्दतीने केली आहे. ऋतूनुसार ते आपल्या शेतात विविध पिके घेत आहेत. नोव्हेंबरमध्ये चवळी, मका, बाजरी, तर फेब्रुवारीमध्ये मुळा, तांबडी भाजी, भेंडी तर पावसाळ्यात इतर भाज्यांची लागवड करतात. पावसाळी कंदमुळांना सुध्दा बाजारात मोठी मागणी असते. अळूसुध्दा नैसर्गिक पध्दतीने केल्याने चांगला दर मिळतो. त्यामुळे त्यांची ही स्वयंपूर्ण रोजगाराकडे वाटचाल आहे.

हळद लागवड फायद्याची : यावेळी देसाई म्हणाले, आपण गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या शेतात विविध पिके घेत आहे. मात्र उपद्रवी प्राणी आपल्या शेतीची नासधूस केल्याने मोठे नुकसान सोसावे लागले. त्यामुळे काही वेळा मनस्ताप होतो. शेती करून चार पैसा मिळण्यापेक्षा कलेली मेहनत या प्राण्यामुळे वाया जाते त्यामुळे काही शेतकरी शेती करणे बंद करतात. आपण सुध्दा असाच विकास केला होता. मात्र गेल्या दोन तीन वर्षापासून आपण हळद लागवड करत आहे. या हळदीमुळे उपद्रवी प्राणी कमी झाले आहेत.

agriculture
Valpoi News : डांबरीकरण नव्हे, मलमपट्टी! पहिल्याच पावसात रस्त्याची लागली 'वाट'

नैसर्गिक शेती आरोग्यासाठी गुणकारी

यावेळी सयाजी देसाई म्हणाले, दिवसेंदिवस आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. त्यात बाजारात मिळणारी रासायनिक पालेभाज्यांच्या सेवनामुळे अनेक आरोग्याच्या तक्रारी वाढत असतात. त्यामुळे आपण आपली पारंपरिक शेतीची जपणूक करत असताना नैसर्गिक पध्दतीने भाज्यांची लागवड करण्यावर भर देत आहोत.

जुलैमध्ये झेेंडू फुलांची लागवड

सयाजी देसाई हे आपल्या शेतात मिश्र भाज्यांबरोबर झेंडू फुलांचीही लागवड करणार आहेत. दरवर्षी ते झेंडू फुलांचा मळा तयार करतात. यंदा पावसाळा उशिरा सुरू झाला आहे, तसेच नवरात्रोत्सव, दसरा व दिवाळी सण उशिरा येणार असल्याने काही दिवसांनंतर ते झेंडूची लागवड करतील.

agriculture
Valpoi : भूमिगत केबलचा ‘दाबोस’ला होणार लाभ; लवकरच कामाला प्रारंभ!

गोआधारित हिरवा चारा

डाॅ. पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या तत्त्वानुसार नैसर्गिक पद्धतीने म्हणजे गोआधारित नैसर्गिक शेती ते करत आहेत. या शेतात ते जीवामृताचा वापर करत आहे. जीवामृत म्हणजे शेण, गोमूत्र, बेसन, सेंद्रिय गुळ यांचा वापर ते शेतीसाठी वापरत आहेत. यामुळे त्यांची शेतीची भरभरून लागवड होते. तसेच त्यांच्या देशी गाई पण आहेत. त्यांनी नैसर्गिक शेतीसाठी खास गुरांचे पोषण ते करत आहे. पशूंसाठी खास दोन हजार चौ.मी. जमिनीत त्यांनी हिरव्या चाऱ्याची लागवड केली आहे. यासाठी नवीन मेगा स्वीट हे एडवंटा कंपनीच्या हिरव्या चाऱ्याची लागवड केलेली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com