Illegal Constructions Goa: भावनेपेक्षा जनहिताला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे! सडेतोड नायक

Goa News: रस्त्याच्या बांधकामात अडचण निर्माण करणारी कोणत्याही प्रकारची आस्थापने हटविण्याचा पूर्ण अधिकार सरकारला असल्याचे मत निवृत्त न्यायमूर्ती आर.एम.एस. खांडेपारकर यांनी व्यक्त केले.
Sadetod Nayak
Sadetod NayakDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोव्याला मुक्त होऊन साठहून अधिक वर्षे झाली, तरीदेखील आजही रस्त्यावर येणारी धार्मिक व इतर बांधकामे यांमुळे दुखावणाऱ्या भावना यावर चर्चा करावी लागतेय, हे आमचे दुर्दैव आहे. भावनेपेक्षा जनहिताला प्राधान्य देणे गरजेचे आहे.

कायद्यानुसार रस्त्याच्या बांधकामात अडचण निर्माण करणारी कोणत्याही प्रकारची आस्थापने हटविण्याचा पूर्ण अधिकार सरकारला असल्याचे मत निवृत्त न्यायमूर्ती आर.एम.एस. खांडेपारकर यांनी व्यक्त केले. ‘गोमन्तक टीव्ही’वरील ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात ते बोलत होते.

संपादक-संचालक राजू नायक यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले. या कार्यक्रमात ॲड. क्लियोफात कुतिन्हो तसेच मोहनदास लोलयेकर यांनीही सहभाग घेतला.

Sadetod Nayak
Goa Corruption Case: "मडकईकरांना चौकशीसाठी बोलावून शहानिशा करा", तक्रारदारांची ACBकडे मागणी

न्या. खांडेपारकर म्हणाले, की जर रस्त्याच्या बांधकामात अडथळा ठरणारे मंदिर हलविले तर देवाचे देवत्व जात नाही. देव हा प्रत्येकाच्या हृदयात असतो, तो सर्वव्यापी आहे. त्यामुळे मूर्तीची गरज केवळ प्रार्थनेसाठी असते; परंतु रस्त्यावरील अडचणींमुळे अनेक लोक मरतात त्याचे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मर्जीतल्या व्यक्तींना अभय

रस्ता करताना मर्जीतल्या व्यक्तीचे घर, रेस्टॉरंट, मॉल आदी येत असेल तर रस्ताच वळविला जातो. जर रस्त्यात मंदिर किंवा क्रॉस असेल तर मग रस्ता का वळविण्यात येऊ नये? रस्त्यावर येणारी कोणतीही धार्मिक आस्थापने हटविण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे; परंतु सरकार योग्य पद्धतीने अंमलबजावणी करत नाही, असे मत ॲड. कुतिन्हो यांनी व्यक्त केले.

अवैध बांधकामांना राजकीय वरदहस्त

हल्ली राजकीय नेतेच ‘तुमच्या अवैध बांधकामाला कोण हात लावतो ते मी पाहतो’ अशी जाहीर विधाने करतात. समाजाच्या धार्मिक भावना राजकारण्यांमुळेच दुखावतात. असे विषय वाढू लागले की सरकार आंधळ्याची भूमिका घेते.

आज एखाद्या विषयावर बोललो तर अनेकांच्या भावना दुखावतात. त्याविरोधात घरावर मोर्चे निघतात आणि सरकार केवळ स्थितप्रज्ञपणे पाहते. त्यामुळे उदारमतवादी विचार संपत चालल्याची भीती लोलयेकर यांनी व्यक्त केली.

Sadetod Nayak
Goa Corruption Case: "मडकईकरांना चौकशीसाठी बोलावून शहानिशा करा", तक्रारदारांची ACBकडे मागणी

बेशिस्तपणा वाढतोय

आज समाजात मोठ्या प्रमाणात बेशिस्तपणा वाढला आहे. कारण, आज योग्य शिक्षण मिळणे कठीण होत आहे. समाजाला चांगले शिक्षण प्राप्त झाले तर हा बेशिस्तपणा संपुष्टात येईल. अन्यथा हा बेशिस्तपणा दिवसेंदिवस वाढत जाईल, अशी भीती निवृत्त न्या. खांडेपारकर यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com