Pilgao Gram Sabha: खाणी, बेरोजगारी,परप्रांतीय, आदी मूद्दावरून स्थानिक ग्रामस्थ आक्रमक

कामगार आक्रमक : बेरोजगारीवर तोडगा निघेपर्यंत परवाना देऊ नये
Pilgao Gram Sabha
Pilgao Gram SabhaDainik Gomantak

Pilgao Gram Sabha : खाणी, बगलरस्ता, परप्रांतीयांची वाढती संख्या आदी विषयांवरुन पिळगावची ग्रामसभा बरीच तापली. काही माजी पंचसदस्यांनी विविध मुद्यावरुन विद्यमान पंचसदस्यांवर हल्लाबोल केला. वादविवादामुळे सकाळी ११ वा. सुरु झालेली ही ग्रामसभा दुपारी दीड वाजेपर्यंत चालली.

पिळगाव पंचायतीची ग्रामसभा आज (रविवारी) सरपंच मोहिनी जल्मी यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत सभागृहात घेण्यात आली. या ग्रामसभेस उपसरपंच सुनील वायंगणकर, पंच चेतन खोडगिणकर, उमाकांत परबगावकर,

स्वप्नील फडते आणि धनश्री बेतकीकर उपस्थित होते. सरपंच जल्मी यांनी स्वागत केले. पंचायत सचिव परब यांनी मागील ग्रामसभेचे इतिवृत्त सादर केले.

कामावरून कमी केलेल्या व सध्या बेरोजगार असलेल्या कामगारांचा विषय प्रामुख्याने या ग्रामसभेत चर्चेत आला. कामगारांचा प्रश्न सुटेपर्यंत पंचायतीने खाण सुरु करण्यास आवश्यक परवाना देऊ नये. अशी मागणी सेझाच्या स्थानिक कामगारांनी ग्रामसभेत केली.

त्यांना उपस्थित बहुतांश ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. तसा ठरावही घेण्यात आला. कामगार आणि गावचे हित लक्षात घेऊनच निर्णय घेण्यात येईल, असे सरपंच मोहिनी जल्मी यांनी ग्रामसभेत स्पष्ट केले.

Pilgao Gram Sabha
Goa Congress: ‘व्‍याघ्रक्षेत्र’प्रश्‍‍नी सरकारकडून लोकांची दिशाभूल! - काँग्रेसचा आरोप

शिवरायांचा पुतळा उभारण्याचा ठराव

हिंदवी राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याच्या प्रस्तावावर ग्रामसभेत चर्चा झाली.पंचायत कार्यालयानजीकच्या उद्यानात पुतळा उभारण्यात येणार असून, संदेश गोवेकर यांनी हा ठराव मांडला. त्याला सर्वांनी पाठिंबा दिला.

परप्रांतीयांचा मुद्दा चर्चेत, सर्वे करा !

गावात परप्रांतीयांचा आकडा वाढत आहे. सध्याच्या घडीस हा आकडा एक हजारापेक्षा अधिक असून, या लोकांमुळे गावात वीज, पाणी पुरवठा आदी समस्या निर्माण होत आहेत. असा मुद्दा माजी पंच संदेश गोवेकर यांनी उपस्थित केला. परप्रांतीय लोकांचे सर्वेक्षण करावे. भाड्याने घरे दिलेल्यांकडून महिन्याचे भाडे आकारण्याची सूचनाही केली.

Pilgao Gram Sabha
Goa Shipyard News: जहाज बांधणीसाठी AI चा वापर; गोवा शिपयार्डचा इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्ससोबत सामंजस्य करार

रस्त्याचा मुद्दा चर्चेत

सारमानस ते पिळगावपर्यंतच्या बगल रस्त्याचा विषय ग्रामसभेत तापला. या रस्त्याच्या कामाबाबत माजी पंच अनिल नाईक यांनी या प्रभागाचे पंच तथा उपसरपंच सुनील वायंगणकर यांना प्रश्न उपस्थित केला.

मात्र समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने अनिल नाईक यांनी उपसरपंच वायंगणकर यांना खोटी माहिती देतात,असे म्हणत धारेवर धरले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com