Shivraj Singh Chouhan: गोव्यात आलं की परत जावं असं वाटत नाही; मोदी सरकारमधील कृषीमंत्री असं का म्हणाले?

Shivraj Singh Chouhan: एकत्र येऊन शेती केल्यास त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ शेतकऱ्यांना होईल.
Shivraj Singh Chouhan: गोव्यात आलं की परत वाटतं नाही, राज्यात शेतीची स्थिती चांगली; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान
Shivraj Singh ChouhanDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आपल्याजवळ असलेल्या संसाधनांचा तसेच सरकारी अधिकाऱ्यांच्या क्षमतेचा वापर करत आपण आपल्या प्रदेशाला कशा प्रकारे समृद्ध करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'स्वयंपूर्ण गोवा' होय. हा उपक्रम येत्या काळात देशाला दिशादर्शक ठरणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले.

'स्वंयपूर्ण गोवा' अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आभासी पद्धतीने चौहान मार्गदर्शन करत होते. या आभारी मार्गदर्शन कार्यक्रमात राज्यभरातील शेतकरी, स्वयंपूर्ण मित्र, ग्रामपंचायत, नगरपालिका मंडळांचा सहभाग होता. या कार्यक्रमादरम्यान गोव्याच्या 'लखपती दीदी' ठरलेल्या स्नेहा नाईक व राणीया नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Shivraj Singh Chouhan: गोव्यात आलं की परत वाटतं नाही, राज्यात शेतीची स्थिती चांगली; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान
Viral News: रात्री इथं विचित्र घटना घडतात! टॅक्सी चालकाने गोवा विमानतळावर अनुभवलेला 'व्हायरल' थरार काय?

सामूहिक पद्धतीने शेती करा

गोव्यात शेतीची स्थिती चांगली आहे. देशात अनेक राज्यांत बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे आता सेंद्रीय शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे. खतांच्या अतिवापरामुळे शेतीची सुपीकता नष्ट झाली आहे.

आता एका शेतकऱ्याने शेती करण्यापेक्षा गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती केल्यास त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ शेतकऱ्यांना होईल. तसेच महिलांना देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे, असे मंत्री चौहान म्हणाले.

Shivraj Singh Chouhan: गोव्यात आलं की परत वाटतं नाही, राज्यात शेतीची स्थिती चांगली; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान
Tito's Lane Viral Video पाहून संतापले आमदार कार्लुस फेरेरा; म्हणाले, 'लाजिरवाण्या पातळीवरचे पर्यटन'

हरित पर्यटनाला चालना देणे गरजेचे

राज्य सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहे. उत्कृष्ट बीज पुरविले जात आहे. गोव्यात खाद्यप्रदूषणाची एकही घटना घडलेली नाही, ही उल्लेखनीय घटना आहे. गोव्याला निसर्गाने भरभरून दिले आहे.

गोव्यात आले की पुन्हा परत जाऊ नये असेच वाटते. पर्यटनाच्या अनुषंगाने हरित पर्यटनाला चालना देण्याचा सरकारचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे, असे चौहान यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com