
Water Supply Management Master Plan
पणजी: राज्यात नव्याने निर्माण होणाऱ्या वसाहती, तसेच दरवर्षी वाढती पर्यटकांची संख्या, हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील बदलते स्वरूप यामुळे दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत आहे. भविष्यकाळातील मागणी आणि तुटवडा लक्षात घेऊन राज्य सरकारने पाणी टंचाईची समस्या टाळण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे. सुमारे २५० एमएलडी पाणी पुरवठ्याच्या योजना निर्मितीस प्रारंभ केला आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याची (साबांखा) खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे, पाणी प्रक्रिया क्षमता ६५५ एमएलडी आहे, तर विभागामार्फत २० एमएलडी पाणी विभागाच्या ग्रामीण योजनेतून पुरविले जाते. पाणी पुरवठ्याचे काम साबांखातर्फे केले जाते, तर साठवणुकीची कामे जलस्रोत खात्याकडून केली जाते. पाणी पुरवठ्यासाठी लागणारी जलप्रक्रिया प्रकल्पाची उभारणी साबांखाकडून होते. सध्या विविध क्षमतेचे जलप्रक्रिया प्रकल्पांची उभारणी होत आहे. साबांखातर्फे घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक वापरासाठी पाणी पुरवठा केला जातो.
पीळर्ण-साळगाव पठारावर १५ एमएलडी पाणी जल शुद्धीकरण प्रकल्प उभारला जात आहे, ज्यामुळे कळंगुट आणि साळगाव मतदारसंघातील पाणी टंचाईची समस्या दूर होणार आहे. दरवर्षी या भागात पाण्याची समस्या उद्भवते, त्यामुळे या परिसरातील नागरिकांना टँकर मागवावे लागतात. प्रकल्प कार्यान्वित होताच या भागातील नळपाणी पुरवठ्याची समस्या कायमची दूर होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.