
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत चोख प्रत्युत्तर दिले. तब्बल 15 दिवसांनी भारताने पाकड्यांना अद्दल घडवली. त्यानंतर पाकिस्तानने भ्याड हल्ले केले, परंतु भारताने प्रत्येक हल्ला परतवून लावला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी शनिवारी (9 मे) अमेरिकेच्या मध्यस्थीने शस्त्रसंधी झाली. मात्र पाकड्याने या शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतावर हल्ले केले.
त्यानंतर आता सोमवारी (12 मे) भारतीय लष्कर प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन पाकड्यांचा बुरखा फाडला. या पत्रकार परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता देशाला संबोधित करणार आहेत. भारतीय लष्कराकडून (Indian Army) यशस्वीरित्या ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आल्यानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान आपल्या भाषणादरम्यान पाकड्यांना काय संदेश देणार? भारतीय लष्कराच्या यशस्वी कामगिरीबाबत काय सांगणार? आणि विशेष म्हणजे जगाला काय संदेश देणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांच्या भाषणातून मिळतील.
भारतीय लष्कर प्रमुखांनी पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या कुरापतींचा पाढा वाचला. हवाई दलाकडून सांगण्यात आले की, 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील दहशतवादी तळांना लक्ष्य केले. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याने भारताला चोख प्रत्युत्तर देण्यास भाग पाडले. पाकिस्तानकडून भारतावरील (India) हल्ल्यासाठी चिनी क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला, पण आम्ही हा हल्ला परतवून लावला. आपल्या अत्याधुनिक संरक्षण प्रणालीने ही क्षेपणास्त्रे नष्ट केली.
हवाई दलाच्या वतीने माध्यमांना संबोधित करताना एअर मार्शल भारती यांनी सांगितले की, "आम्ही दहशतवाद्यांच्या तळांवर अचूक हल्ले केले, परंतु पाकिस्तानी सैन्याने ते स्वतःवर घेतले. आमचा उद्देश पाकिस्तानी सैन्याशी युद्ध करणे किंवा त्यांच्या ठिकाणांना लक्ष्य करणे नव्हता. हे आम्ही आधीच स्पष्ट केले होते.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.