बहुतांश भारतीयांनी ओलांडली मर्यादा, गरजेपेक्षा 3 ग्रॅम जास्त मिठाचे सेवन

या अभ्यासात असे दिसून आले की, बेरोजगारांपेक्षा नोकरदार (8.6 ग्रॅम), तंबाखू सेवन करणारे (8.3 ग्रॅम), लठ्ठ (9.2 ग्रॅम) आणि रक्तदाब असलेले (8.5 ग्रॅम) जास्त मीठाचे सेवन करत असल्याचे आढळले.
Most Indians exceed the limit of salt intake, consuming 3 grams of  more than required.
Most Indians exceed the limit of salt intake, consuming 3 grams of more than required.Dainik Gomantak
Published on
Updated on

Most Indians exceed the limit of salt intake, consuming 3 grams of more than required:

नेचर पोर्टफोलिओ जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, शिफारस केलेली दैनिक मीठ सेवनाची मर्यादा 5 ग्रॅम असताना, सरासरी भारतीय व्यक्ती दररोज 8 ग्रॅम मीठाचे सेवन करतो.

हा अभ्यास नॅशनल एनसीडी (असंसर्गजन्य रोग) मॉनिटरिंग सर्व्हेचा भाग म्हणून केलेल्या सर्वेक्षणावर आधारित आहे ज्यामध्ये संशोधकांनी इतर गोष्टींबरोबरच 3,000 प्रौढांमधील मूत्रमार्गात सोडियम (मीठाचा एक महत्त्वाचा घटक) उत्सर्जनाचे निरीक्षण केले.

अभ्यासानुसार, बहुतांश भारतीय प्रौढांमध्ये, सामाजिक-जनसांख्यिकीय प्रोफाइलमध्ये शिफारस केलेल्यापेक्षा जास्त मीठाचे सेवन आढळून आले. परंतु पुढील विश्लेषणात असे दिसून आले आहे की स्त्रियांच्या (7.9 ग्रॅम/दररोज) तुलनेत पुरुषांमध्ये मीठाचे सेवन (8.9 ग्रॅम/दिवस) जास्त होते.

त्याचप्रमाणे, बेरोजगारांपेक्षा नोकरदार (8.6 ग्रॅम), तंबाखू सेवन करणारे (8.3 ग्रॅम), लठ्ठ (9.2 ग्रॅम) आणि रक्तदाब असलेले (8.5 ग्रॅम) जास्त मीठाचे सेवन करत असल्याचे आढळले.

सोडियमचे प्रमाण जास्त असलेला आहार, सामान्य मिठाचा एक महत्त्वाचा घटक आहे जो आपण दररोज वापरतो, त्यामुळे हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक येऊ शकतो.

नेचर पोर्टफोलिओच्या या अभ्यासाचे प्रमुख ICMR-नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्चचे संचालक डॉ. प्रशांत माथूर यांनी सांगितले की दररोज किमान 1.2 ग्रॅम आहारातील सोडियमच्या वापरामध्ये कपात केल्यास मिठाच्या अतिसेवनाचे प्रमाण 50% कमी होण्यास मदत होईल.

Most Indians exceed the limit of salt intake, consuming 3 grams of  more than required.
आता चेन्नईतही डिस्नेलँड सारखे थीम पार्क, तामिळनाडू उघडणार अ‍ॅडव्हेंचर, एंटरटेनमेंट अन् बीच टुरिझमचा खजिना

या अभ्यासात असे दिसून आले की, मिठाचे सेवन कमी करण्याच्या महत्त्वाविषयी जागरुकता भारतीय नागरिकांमध्ये कमी आहे.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की भारतातील एकूण मृत्यूंपैकी सुमारे 28.1 टक्के मृत्यू हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमुळे होतात. उच्च सोडियमयुक्त आहारामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

Most Indians exceed the limit of salt intake, consuming 3 grams of  more than required.
26/11 हल्ल्यापूर्वी मास्टर माइंडने केली होती गर्दीच्या ठिकाणांची रेकी, तपासात समोर आली माहिती

“प्रौढांसाठी WHO ने शिफारस केलेल्या 5 ग्रॅम पर्यंत दैनंदिन मिठाचे सेवन मर्यादित करणे हा रक्तदाब वाढण्याचे प्रमाण 25% कमी करण्यासाठी आणि सरासरी लोकसंख्येच्या मिठाच्या सेवनात 30% कपात मिळवण्याचा एक फायदेशीर आणि खर्च वाचवणारा मार्ग आहे. 2025,” अहवालात नमूद केले आहे.

“कमी सोडियम मिठाच्या पर्यायांची उपलब्धता आणि परवडण्याजोगी धोरणे तयार करून लोकसंख्येतील मिठाचे सेवन कमी कण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. इतर संभाव्य उपायांमध्ये जनजागृती, अन्न विक्रेत्यांचे प्रशिक्षण आणि पॅकबंद खाद्यपदार्थांमध्ये सोडियम प्रमाणाचे स्पष्ट लेबलिंग यांचा समावेश करण्याची गरज आहे,” असे अभ्यात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com