India China: गलवान संघर्षानंतर पहिल्यांदाच राजनाथ सिंह यांची चीनच्या संरक्षणमंत्र्यांशी चर्चा

2020 मध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती, त्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले होते.
India China
India Chinadainik gomantak
Published on
Updated on

गलवान संघर्षानंतर प्रथमच भारत आणि चीन यांच्यात चर्चा झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ यांनी गुरुवारी चीनचे समकक्ष जनरल ली शांगफू यांच्याशी चर्चा केली. दिल्लीत शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली. 2020 मध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती, त्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले होते. मात्र, त्यानंतर दोन वेळा कॉर्स कमांडर स्तरावर बोलणी झाली.

राजनाथ सिंह 27 आणि 28 एप्रिल रोजी सहभागी संरक्षण मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतील, जिथे द्विपक्षीय संरक्षण संबंधित मुद्द्यांवर आणि परस्पर हिताच्या इतर बाबींवर चर्चा केली जाईल. असे संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

यापूर्वी रविवारी, भारत आणि चीन यांच्यात कॉर्प्स कमांडर-स्तरीय चर्चेची 18 वी फेरी झाली, ज्यामध्ये दोन्ही देशांनी जवळच्या संपर्कात राहण्यास आणि पूर्व लडाखमधील उर्वरित समस्यांवर लवकरात लवकर परस्पर स्वीकारार्ह तोडगा काढण्याचे मान्य केले. तथापि, दोन्ही देशांमधील सीमा विवाद तीन वर्षांपासून सुरू आहे आणि तो संपुष्टात येण्याची कोणतीही स्पष्ट चिन्हे नाहीत.

India China
Ramesh Tawadkar : 'लोकांची दिशाभूल केली', सभापती तवडकर ठोकणार 'या' दोन नेत्यांवर मानहानीचा दावा

5 मे 2020 रोजी पूर्व लडाख सीमेवरील पॅंगॉन्ग सरोवर परिसरात झालेल्या लष्करी संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले. गलवान खोऱ्यात झालेल्या भीषण संघर्षानंतर जून 2020 मध्ये संबंध आणखी ताणले गेले. सीमावर्ती भागात शांतता प्रस्थापित होईपर्यंत चीनसोबतचे संबंध सामान्य होऊ शकत नाहीत, असे भारताने म्हटले आहे.

भारताच्या तयारीला सामोरे जाण्यासाठी चीन लडाखच्या विरुद्ध भागात आपले हवाई आणि जमीनी सैन्य बळकट करत आहे. एवढेच नाही तर आपल्या हद्दीत गस्त घालणाऱ्या भारतीय विमानांना धोका निर्माण करण्यासाठी चीनने आपली हवाई संरक्षण यंत्रणाही तैनात केली आहे. त्याच वेळी, चीनच्या कोणत्याही गैरप्रकाराला तोंड देण्यासाठी भारत पूर्व लडाख क्षेत्रात नियमितपणे नवीन रडार आणि हवाई संरक्षण यंत्रणा तैनात करत आहे.

यापूर्वी 17 जुलै 2022 रोजी 16वी बैठक झाली होती. त्यानंतर, या 20 डिसेंबर रोजी, पश्चिम क्षेत्रातील एलएसीशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी दोन्ही बाजूंनी खुल्या आणि रचनात्मक पद्धतीने चर्चा केली. या संभाषणादरम्यान, दोन्ही बाजूंनी पश्चिम भागात तळागाळात सुरक्षा आणि स्थिरता राखण्यावर सहमती दर्शवली. दोन्ही बाजूंनी संपर्कात राहण्याचे आणि लष्करी आणि मुत्सद्दी माध्यमांद्वारे संवाद कायम ठेवण्यास आणि उर्वरित मुद्द्यांवर लवकरात लवकर परस्पर स्वीकारार्ह तोडगा काढण्यावर काम करण्याचे मान्य केले.

अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये चिनी लष्कर आणि भारतीय लष्कर यांच्यात झालेल्या चकमकीवर चिनी सैन्याने उशिराने पहिली प्रतिक्रिया दिली होती. या चकमकीबाबत चीनने भारतीय लष्करावर आरोप केले होते. भारतीय लष्कराच्या सैनिकांनी बेकायदेशीरपणे वादग्रस्त सीमा ओलांडल्याचा आरोप चिनी लष्कराने केला होता, ज्यामुळे चकमक झाली. तथापि, मोदी सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की 9 डिसेंबर रोजी झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याने अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे चिनी सैन्याने केलेला घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आणि त्यांना हुसकावून लावले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, या चकमकीत एकही भारतीय जवान शहीद झाला नाही आणि कोणीही गंभीर जखमी झाले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com