वाळपई: पाकने भारतावर वारंवार दहशतवादी हल्ले केले. मात्र यावेळी ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे भारताने दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून ठोस प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साहसी नेतृत्वामुळे हे शक्य झाले. देश रक्षणासाठी एकत्र येण्याची हीच वेळ आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आज सांगितले.
ही यात्रा काढणे गरजेचे होते, कारण भारताच्या सशस्त्र दलांच्या शौर्य, बलिदान आणि देशभक्तीला दिलेली ही सलामी आहे,असेही राणे यांनी सांगितले.
वाळपईत आज विश्वजित राणे यांच्या नेतृत्वाखाली वाळपई मतदारसंघातील देशप्रेमी नागरिकांच्या सहभागाने भव्य ‘सिंदूर यात्रा’ काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. ही यात्रा आरोग्यमंत्री राणे यांच्या कार्यालयापासून शहीद स्तंभापर्यंत काढण्यात आली. यात शेकडोंच्या संख्येने महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, स्वयंसेवक आणि नागरिकांनी भाग घेतला.
राणे पुढे म्हणाले, पाकिस्तानकडून भारतात सतत अस्थिरता पसरवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. सोशल मीडियावर धर्माधारित फूट पाडणारे व्हिडिओ प्रसारित केले जात आहेत. अशा स्थितीत भारतीयांनी सावध राहणे, संशयास्पद हालचाली विषयी पोलिसांना कळवणे,देशसुरक्षेसाठी एकदिलाने उभे राहणे आवश्यक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.