Anupam Kher Dainik Gomantak
मनोरंजन

Anupam Kher : 1971 च्या 'पाकिस्तान'सोबतच्या यु्द्धावेळी मी पहारा द्यायचो अन् सायरन वाजताच...अनुपम खेर यांचा तो किस्सा...

अभिनेता अनुपम खेर यांनी 1971च्या युद्धावेळचा एक किस्सा सांगितला आहे.

Rahul sadolikar

आपल्या अभिनयाने गेली 4 दशके चाहत्यांना प्रभावित करणारे अभिनेते अनुपम खेर गेल्या काही दिवसांपासुन सोशल मिडियावर चर्चेत आहेत. द कश्मिर फाईल्स या चित्रपटापासुन अनुपम खेर यांच्या चाहत्यांमध्येही वाढ झाली आहे. आता त्यांनी त्यांच्या लहानपणीचा एक किस्सा शेअर केला आहे.

प्रसिद्ध कलाकार अनुपम खेर लहानपणी NCC कॅडेट होते आणि त्यांना सैन्यात भरती होण्याची इच्छाही होती. मात्र, अभिनयाच्या दुनियेत एंट्री केल्याने त्याला त्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनुपम खेर यांनी काही किस्से शेअर केले आहेत.

अनुपम खेर यांनी सांगितले "1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि माझा जन्म 1955 मध्ये झाला. अशा प्रकारे मी माझ्या देशापेक्षा 8 वर्षांनी लहान आहे. माझ्याकडे 1962 च्या चीन युद्धाच्या काही आठवणीही आहेत. 

1965 मध्ये पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धाच्या काही आठवणी आहेत. पण 1971 मध्ये मी 16 वर्षांचा होतो आणि मी NCC मध्ये होतो. मी माझ्या परिसराचा पहारेकरी असायचो". 

या आठवणी सांगताना पुढे ते म्हणाले "रात्री सायरन वाजला की आम्ही खोदलेल्या खड्ड्यात लपून बसणे, आकाशकंदील लावुन वर्तमानपत्रे तपासणे आणि फिरणे अशी कामं करायचो. त्यावेळी मी स्वत:ला एक अतिशय जबाबदार नागरिक समजत होतो.

 म्हणूनच जेव्हा जेव्हा देशाबद्दल काहीही बोलले जाते तेव्हा मी मोठ्या थाटात बोलतो कारण मी तो काळ पाहिला आहे. तो काळ मी तरुणपणी पाहिला आहे. माझ्या मनात एवढेच आहे.

वेस्टर्न कमांडचे मुख्य कार्यालय शिमल्यात होते, मी आमचे सैनिक पाहिले आहेत. सैनिकांसाठी रक्त देताना लोकांना पाहिले आहे. पण मला IB 71 च्या घटनेबद्दल माहिती नाही कारण हे असे नायक आहेत ज्यांबद्दल कोणालाही माहिती नाही. 

या मोहिमेचा पायलट एक काश्मिरी पंडित आहे, असा संदेश नुकताच मला कोणीतरी पाठवला. या 30 लोकांची कहाणी सांगायला आम्हाला 50 वर्षे लागली". 

माझे काका प्यारे लाल खेर जी, माझ्या वडिलांचे सर्वात धाकटे बंधू, ते स्वतः इंटेलिजन्स ब्युरोमध्ये असिस्टंट डायरेक्टर पदावरून निवृत्त झाले होते, पण ते काय करायचे हे मला किंवा माझ्या आई-वडिलांना आणि कुटुंबाला माहीत नव्हते. 

खुद्द इंटेलिजन्स ब्युरोनेच बंदोबस्त केलेल्या या अपहरण झालेल्या विमानातून जे ३० जण पाकिस्तानात गेले होते, त्यांनी कोणत्याही शस्त्राशिवाय हे कसे केले, हे चित्रपटात पाहून आपणही चक्रावलो. 30 पैकी 30 लोक भारतात परत आले होते. त्यांच्या मनात काय चालले असेल? त्याच्याबद्दल कोणालाच माहिती नाही. आम्हाला आमच्या सैन्याचा अभिमान आहे, तसेच आम्हाला इंटेलिजन्स ब्युरोचा अभिमान आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

PM Narendra Modi: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान विष्णूंचे 11वे अवतार!' भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ; सांगितले 'हे' कारण

SCROLL FOR NEXT