Nawazuddin Siddiqui  Dainik Gomantak
मनोरंजन

नवाजुद्दीनला बदलायचंय बॉलिवूडचं नाव

इंडिया इकोनॉमिक कॉनक्लेव्ह २०२२ या कार्यक्रमास लावली हजेरी

दैनिक गोमन्तक

मुंबई : आपलं मत परखड मत स्पष्टपणे मांडण्याची खासियत असलेला बॉलिवूडच्या टॉप कलाकार यादीमध्ये समाविष्ट असलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांने पुन्हा एकदा आपलं मत स्पष्ट करत बॉलिवूडचं नाव आपल्याला बदलायचं आहे. असे म्हणत बॉलिवूडला दुसरं नावं काय ठेवणार आहे. हे ही स्पष्ट केलं आहे. ( Actor nawazuddin siddiqui talk about bollywood industry )

नवाजुद्दीन सिद्दीकीने नुकतंच ‘इंडिया इकोनॉमिक कॉनक्लेव्ह २०२२’ या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान त्याला बॉलिवूडबाबत त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांना उत्तर देताना नवाजुद्दीनने आपल्याला चक्क बॉलिवूडचं नावच बदलायचं आहे. असे म्हणत “बॉलिवूडमध्ये कोणते बदल घडले पाहिजेत यावर प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्याने बोलताना “मी बॉलिवूडमधील तीन गोष्टी बदलू इच्छितो असे तो म्हणाला.

याबाबत तो म्हणाला कि, प्रथम मी बॉलिवूडचं नाव बदलून हिंदी चित्रपटसृष्टी ठेवेन, दुसरं म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या सेटवर रोमन लिपीमध्ये कलाकारांना स्क्रिप्ट दिली जाते. मी ती स्क्रिप्ट देवनागरी लिपीमध्ये मागतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे हिंदी चित्रपटांच्या सेटवर हिंदी भाषेमध्ये बोललं पाहिजे. चित्रपट हिंदी पण दिग्दर्शक आणि सहाय्यक दिग्दर्शक देखील इंग्रजी भाषेतच बोलतात,” असे नवाजुद्दीन म्हणाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT