udhav thakcery.jpg
udhav thakcery.jpg 
महाराष्ट्र

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर उद्धव ठाकरे शांत का? विरोधी पक्ष पुन्हा आक्रमक  

दैनिक गोमंतक

नवी दिल्ली :  महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांच्या याचिकेवर दिलेल्या निर्णयानंतर देशमुख यांनी राजीनामा दिल्यामुळे  महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ मजली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणावर आता महाराष्ट्रातील विरोधी पक्ष पुन्हा आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. भाजपाने सत्ताधारी ठाकरे सरकारवर निशाणा साधला असून थेट त्यांचा राजीनामा मागितला आहे.  भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचा आदेश मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यात राज्य करण्याचा नैतिक अधिकार गामावल्याचा आरोप केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणावर गप्प आहेत. शरद पवार म्हणतात की मुख्यमंत्री मंत्रीपदाचा निर्णय घेतात. कॉंग्रेस आणि शिवसेना म्हणते, अनिल देशमुख यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस निर्णय घेईल. अनिल देशमुख यांनी शरद पवार यांच्यासही भेट घेतल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. सर्व घटना क्रमावर रविशंकर प्रसाद यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात अशा मोठमोठ्या घटना घडत आहेत त्यांचा कोणताही नैतिक कर्तव्य नाही का, असा सवाल रवीशंकर प्रसाद यांनी विचारलं आहे. 

अनिल देशमुख यांनी आपल्या राजीनाम्यात नमूद केले की ते नैतिक कारणास्तव पदाचा राजीनामा देत आहेत, परंतु या संपूर्ण प्रकरणात उद्धव ठाकरे यांचे मौन अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत.  मुख्यमंत्री, तुमची काही नैतिकता आहे की नाही? तुमची नैतिकता कुठे आहे? आम्हाला तुमच्या नैतिकतेबद्दल ऐकायचे आहे. असे अनेक प्रश्न रविशंकर प्रसाद विचारले आहेत. त्याचबरोबर या सर्व घटनाक्रमानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता राज्य करण्याच्या नैतिक अधिकारापासून वंचित झाले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.  

तर दुसरीकडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे,  महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांनी वाचविण्याचे  प्रयत्न केले. मात्र शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाले तेव्हाच त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. अखेर उच्च न्यायालयाने  हस्तक्षेप केल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र या सर्व घटनाक्रमावर उद्धव ठाकरे शांत का आहेत, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT