Accident  Dainik Gomantak
महाराष्ट्र

सांगलीत टेम्पो आणि कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झालेल्या टेम्पोमधून 12 लोक प्रवास करत होते.

दैनिक गोमन्तक

सांगली शहरातील आयर्विन पुलावर भजनी मंडळाचा टेम्पो आणि कारची धडक झाली आहे. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 5 ते 7 लोक जखमी झाले आहेत. याचबरोबर 3 जणांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती समोर येत आहे. (tempo and car crash in Sangli two people died on the spot)

जखमींना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचले.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झालेल्या टेम्पोमधून 12 लोक प्रवास करत होते. ते सर्वजण भजनाच्या कार्यक्रमासाठी शिरोळला जात होते. अपघातात टेम्पो आणि कारच्या दर्शनी भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. टेम्पोच्या स्टेअरींगसह दरवाजा आणि इतर भागाचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातातील जखमी झालेल्या तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी (Doctor) दिली आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra) रस्ते अपघातांची मालिका सुरूच आहे. रस्त्यांची दुरुस्ती आणि वाहतूक नियम कडक करण्याची गरज आहे, असे नागरिकांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT