School News Dainik Gomantak
महाराष्ट्र

Deepak Kesarkar : राज्यातील शिक्षकांसाठी सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

शिक्षकांवरील भार कमी करण्याच्या दृष्टीने सरकारकडून महत्वाचे निर्णय

गोमन्तक डिजिटल टीम

सध्या रत्नागिरीत प्राथमिक शिक्षकांचे अधिवेशन सुरु असून या 17 व्या अधिवेशनाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. या समारंभाप्रसंगी केसरकर यांनी राज्यातील शिक्षकांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.

शिक्षक सेवकांना 16 हजार रुपये वेतन देण्यात येणार असून राज्यातील केंद्रप्रमुखांच्या सगळ्या जागा भरल्या जातील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. तसेच शिक्षकांवरील भार कमी करण्यात येणार असून शिक्षकांची अशैक्षणिक कामे वगळण्याचा जीआर काढण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

आता डॉक्टरांच्या गाडीवर DR असते त्याप्रमाणे शिक्षकांच्या गाड्यांवर TR असे लिहिण्याची परवानगी लवकरच देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी संकेत दिलेत.

तसेच अन्य शालेय सुविधांबाबत बोलताना केसरकर म्हणाले, यापुढे खुल्या गटाच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार आहे. मुलांसाठी असलेल्या टॉयलेट्स आणि शालेय कंपाउंडसाठी 590 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच राज्य सरकार शिक्षकांचे पगार वेळेवर होण्यासाठी प्रयत्नशील असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT