Building collapses in Bandra  Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबई येथील इमारत कोसळली ; एकाचा मृत्यू,तर 18 जण गंभीर जखमी

घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.

दैनिक गोमन्तक

मुंबईतील वांद्रे येथील शास्त्रीनगर (Shastri Nagar) परिसरात मध्यरात्री 12.30 च्या सुमारास तीन मजली इमारत कोसळली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 18 जण गंभीर जखमी आहेत, अशी माहिती समोर आली आहे. जखमींवर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच बचाव पथक, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या, पोलिस , रुग्णवाहिका आणि महापालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

सदर घटनेबाबत माहिती देताना डीसीपी मंजुनाथ सिंगे यांनी सांगितलं की, "मध्यरात्री 12 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास वांद्रे येथील शास्त्रीनगर मधील तीन मजली इमारत कोसळली. तळमजल्यावरील सर्व नागरिक सुखरूप असून, पहिल्या मजल्यावर 6 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. तर दुसऱ्या मजल्यावरील 17 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. या पैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर इतर 16 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे."

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एक तरुण कामासाठी कुठेतरी जात असताना त्याच्या डोळ्यांसमोर इमारत कोसळली. त्यानं घटनेचं गांभीर्य ओळखून इतरांच्या मदतीने तात्काळ बचावकार्य सुरु केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT