Cow  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Kolhapur: पंचमहाभूत सोहळा सुरू असताना कणेरी मठाच्या गोशाळेतील 52 गायींचा मृत्यू का झाला?

Pramod Yadav

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध कणेरी मठावर गेल्या 4 दिवसांपासून पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या लोकोत्सवाचे उद्घाटन झाले होते.

दरम्यान, मठाच्या गोशाळेतील 52 गायींचा मृत्यू का झाल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. या गोशाळेत हजारो देशी गायी आहेत. गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला असून आज, शुक्रवारी (दि.24) ही बाब उघडकीस आली आहे.

कार्यक्रमादरम्यान गोशाळेत असलेल्या हजारो देशी गायी पैकी 52 गायी दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गायींना कालचे शिळे अन्न खायला घातल्याने विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर, सध्या 30 गायींवर उपचार सुरू आहेत.

कणेरी मठावर हजारोंच्या संख्येने गायी असून सध्या जनावरांचे प्रदर्शन सुरू असल्यामुळे मोठ्या संख्येने येथे जनावरे आणण्यात आली आहेत.

दरम्यान, गायींचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती फॉरेन्सिक विभागाकडून घेणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाने सांगितले आहे.

कणेरी मठावर गेल्या 4 दिवसांपासून पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. गुरुवारी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद्र गहलोत यांनी मठावर उपस्थिती लावली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT